अ‍ॅपशहर

...अन् रंगली जुगलबंदी

बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी रविवारी (दि. ७) उज्जैन येथील प्रकृती व संस्कृती वहाने यांची सतार व संतूरची तर पं. कालिनाथ मिश्रा व सत्यप्रकाश मिश्रा यांची तबल्याची जुगलबंदी रंगली होती.

Maharashtra Times 9 Jan 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम balgandharva music festival ends jalgaon
...अन् रंगली जुगलबंदी


बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी रविवारी (दि. ७) उज्जैन येथील प्रकृती व संस्कृती वहाने यांची सतार व संतूरची तर पं. कालिनाथ मिश्रा व सत्यप्रकाश मिश्रा यांची तबल्याची जुगलबंदी रंगली होती.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे कांताई सभागृहात तीन दिवसीय बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, शरदचंद्र छापेकर, जैन फार्मा फ्रेश फूडचे सुनील देशपांडे आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या पहिल्या सत्रात उज्जैन येथील प्रकृती वहाने व संस्कृती वहाने यांनी संतूर व सतार या वाद्यावर राग किरवरणी मधील आलाप जोड सादर केला. त्यानंतर रुपक तालात बंदीश, दृत तीन तालातील रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.

या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसर्‍या सत्रात पं. कालिनाथ मिश्रा व त्यांचे चिरंजीव सत्यप्रकाश मिश्रा यांनी तीन ताल सादर केला. यामध्ये त्यांनी उपज, पराल, काली परण, गणेश परण, शिव परण या तालांची जुगलबंदी रंगली. आज रंगलेल्या संतूर, सतार अन् तबल्याच्या जुगलबंदीने बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज