म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
रेणके आयोगाच्या शिफारशी लागु कराव्यात, जाडपडतळणी प्रामणपत्र घरपोच मिळावे या अशा विवीध मागण्यासाठी बंजारा क्रांती दलाकडून लाठीमोर्चा काढण्यात आला. शनिवारी बाजार समितीपासून तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाने परिसर दणाणून उठला होता. मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा समाजबांधव सहभागी झाले होते.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंती दिवस १ जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बंजारा क्रांती दलाकडून मोर्चा काढून बंजारा समाजाच्या समस्यांची जाणीव राज्य सकरारला करून दिली जाते. गेल्या १४ वर्षांपासूनची ही पंरपरा सुरू आहे. त्याप्रमाणे शनिवारीही बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष राकेश जाधव यांच्या नेतृत्वात तालुक्यातील बंजारा समाज बांधवांकडून हा विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाळकृष्ण रेणके, सुंदर डांगे, रामनाथ साबळे, संतोष रावल, गिरीश जगताप, मदन पौळ, संदीप राठोड, साहेबराव राठोड, अविनाश झांबरे आदी तसेच बंजारा समाजबांधव उपस्थित होते. मोर्चात लाठ्या व रंगीत झेंडे घेऊन सहभागी झालेले महिला-पुरुष शहरवासीयांचे लक्ष वेधत होते.
मोर्चानंतर तहसील कार्यालयासमोर छोटेखानी सभेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. भटक्या व विमुक्त जाती जमातींच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून रेणके आयोग स्थापन करण्यात आले होते. या आयोगाने अहवाल सादर करून ९ वर्ष झाली आहेत. तरीही त्यावर अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. स्वातंत्र्य मिळून ६७ वर्ष झाली तरी बंजारा समाजाच्या समस्या सुटलेल्या नाहीत, असेही यावेळी सांगण्यात आले. त्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन रेणके आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी केले. बंजारा समाजाची अवस्था अत्यंत वाईट असून, त्यांच्या समस्या या देशपातळीपर्यंत गेल्या पाहिजे. त्यासाठी प्रसंगी उपोषण करू, असा इशाराही त्यांनी सभेत दिला.
रेणके आयोगाच्या शिफारशी लागु कराव्यात, जाडपडतळणी प्रामणपत्र घरपोच मिळावे या अशा विवीध मागण्यासाठी बंजारा क्रांती दलाकडून लाठीमोर्चा काढण्यात आला. शनिवारी बाजार समितीपासून तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाने परिसर दणाणून उठला होता. मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा समाजबांधव सहभागी झाले होते.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंती दिवस १ जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बंजारा क्रांती दलाकडून मोर्चा काढून बंजारा समाजाच्या समस्यांची जाणीव राज्य सकरारला करून दिली जाते. गेल्या १४ वर्षांपासूनची ही पंरपरा सुरू आहे. त्याप्रमाणे शनिवारीही बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष राकेश जाधव यांच्या नेतृत्वात तालुक्यातील बंजारा समाज बांधवांकडून हा विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाळकृष्ण रेणके, सुंदर डांगे, रामनाथ साबळे, संतोष रावल, गिरीश जगताप, मदन पौळ, संदीप राठोड, साहेबराव राठोड, अविनाश झांबरे आदी तसेच बंजारा समाजबांधव उपस्थित होते. मोर्चात लाठ्या व रंगीत झेंडे घेऊन सहभागी झालेले महिला-पुरुष शहरवासीयांचे लक्ष वेधत होते.
मोर्चानंतर तहसील कार्यालयासमोर छोटेखानी सभेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. भटक्या व विमुक्त जाती जमातींच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून रेणके आयोग स्थापन करण्यात आले होते. या आयोगाने अहवाल सादर करून ९ वर्ष झाली आहेत. तरीही त्यावर अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. स्वातंत्र्य मिळून ६७ वर्ष झाली तरी बंजारा समाजाच्या समस्या सुटलेल्या नाहीत, असेही यावेळी सांगण्यात आले. त्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन रेणके आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी केले. बंजारा समाजाची अवस्था अत्यंत वाईट असून, त्यांच्या समस्या या देशपातळीपर्यंत गेल्या पाहिजे. त्यासाठी प्रसंगी उपोषण करू, असा इशाराही त्यांनी सभेत दिला.