अ‍ॅपशहर

पद्मश्री भंवरलाल जैन यांचे निधन

जगभरातील तब्बल ११६ देशांत पसरलेल्या जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष आणि ठिबक सिंचनाचे प्रणेते पद्मश्री भंवरलाल जैन (७८) यांचे मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान गुरूवार २५ रोजी, दुपारी ४ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. त्यांचे पार्थिव जळगावला आणण्यात आल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जैन हिल्स परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Maharashtra Times 26 Feb 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhawarlal jain jalgaon
पद्मश्री भंवरलाल जैन यांचे निधन


जगभरातील तब्बल ११६ देशांत पसरलेल्या जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष आणि ठिबक सिंचनाचे प्रणेते पद्मश्री भंवरलाल जैन (७८) यांचे मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान गुरूवार २५ रोजी, दुपारी ४ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. त्यांचे पार्थिव जळगावला आणण्यात आल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जैन हिल्स परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भंवरलाल जैन यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे १४ फेब्रुवारी रोजी, विशेष विमानाने मुंबईला हलविण्यात आले होते. तेथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. गुरूवारी दुपारी, जैन यांचे पुत्र व जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी मुंबईहून ‘देव जिंकला, आम्ही हरलो...’ असा मेसेज करून जैन यांच्या निधनाची बातमी कळविली. ती ऐकून जळगावमध्ये शोककळा पसरली. जैन यांचे कुटुंबीय मुंबईहून विशेष विमानांनी जळगावमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या सांत्वनासाठी जळगावातील त्यांचे हितचिंतक आणि मोठा आप्तेष्ट परिवार विमानतळावर उपस्थित होता. जैन यांच्या पश्चात अशोक, अनिल, अजित, अतुल जैन ही चार मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

आज पार्थिव दर्शन, उद्या अंत्यसंस्कार

शुक्रवारी, सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी ११ वाजेपर्यंत जैन हिल्स येथील आकाश मैदानावर भंवरलाल जैन यांच्या पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे. सकाळी ११ च्या सुमारास त्यांचे पार्थिव जैन हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी नेले जाईल. जैन धर्मानुसार धार्मिक विधी आटोपून, ज्या शेतात विविध प्रयोग करून नाविन्याचा मंत्र त्यांनी दिला त्या जैन हिल्सच्या प्रात्यक्षिक भूमीवर त्यांच्यावर दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.

भंवरलाल जैन यांच्या निधनाने देशातील ठिबक क्रांतीचा प्रणेता आपण गमावला आहे. जैन हे तरुणांसाठी उद्यमशीलतेचे नेहमीच प्रेरणास्त्रोत राहिले आहेत, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली तर मोठे भाऊ गमावल्याची क्षती न भरून निघणारी आहे. उद्योग क्षेत्राचा ज्ञानऋषी आपल्यातून निघून गेला असल्याची प्रतिकिया खासदार व राजमल लखीचंद उद्योगसमुहाचे संचालक ईश्वरलाल जैन यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज