अ‍ॅपशहर

अस्वच्छतेच्या चित्रीकरणावरून जुंपली

भुसावळ नगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला. त्या अनुषंगाने संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी शहरातील स्वच्छतेचे चित्रीकरण करीत असताना अस्वच्छतेचेही चित्रीकरण करा, असे जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी म्हटले. यावरून भाजप नगरसेवक व जनाधार पार्टीच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. बाचाबाची देखिल झाली. ही घटना मंगळवारी (दि. २२) सकाळी घडली.

Maharashtra Times 23 May 2018, 4:00 am
भुसावळ नगरपालिकेच्या सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhusawal nagarpalika city cleaning shooting issue
अस्वच्छतेच्या चित्रीकरणावरून जुंपली


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भुसावळ नगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला. त्या अनुषंगाने संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी शहरातील स्वच्छतेचे चित्रीकरण करीत असताना अस्वच्छतेचेही चित्रीकरण करा, असे जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी म्हटले. यावरून भाजप नगरसेवक व जनाधार पार्टीच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. बाचाबाची देखिल झाली. ही घटना मंगळवारी (दि. २२) सकाळी घडली.

गेल्या वर्षी देशातील सर्वात अस्वच्छ शहर म्हणून भुसावळ शहराचा द्वितीय क्रमांक आला होता. यानंतर नगरपालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले. त्यामुळे नुकत्याच झालेल्या भुसावळ पालिकेने ‘फास्टर मुव्हर क्लिननेस सिटी’चा अॅवॉर्ड पटकावला.

या अॅवॉर्ड प्रदान करण्याप्रसंगी भुसावळची एक चित्रफित दाख्वली जाते. त्यासाठी एका एजन्सीचे चार प्रतिनिधी भुसावळ शहरात आलेले आहेत. या एजन्सीद्वारे मंगळवारी (दि. २२) दीनदयाळ नगरमधील स्वच्छतेचे चित्रण करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यावर जनाधार पार्टीचे नगरसेवक दुर्गेश ठाकुर यांनी त्यांना विरोध करून केवळ स्वच्छतेचे चित्रीकरण करण्यापेक्षा अस्वच्छतेचेसुद्धा चित्रीकरण करण्याचे सुचविले. यावरून भाजपचे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकुर आणि दुर्गेश ठाकुर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या प्रसंगी चित्रीकरण करणाऱ्यांचे कॅमेरे ओढण्यापर्यंत वाद पोहचला होता. यानंतर चित्रीकरण करणाऱ्या टीमने हा सर्व प्रकार पाहून थेट नगरपालिका गाठली. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान, विरोधी पक्षनेते उल्हास पगारे यांनी झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. यावर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिल्लीत ही चित्रफित दाखविली जाणार असून, त्यात केवळ स्वच्छताच दाखविली जाणार आहे. यानंतर या वादावर पडदा पडला. परंतु, या वादामुळे पालिकेचे राजकारण ढवळून निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील ४ हजार २०० हून अधिक शहरांचे सर्व्हेक्षण हैदराबाद येथील कार्वी एजन्सीतर्फे करण्यात आले होते. यात विविध ५२ निकष त्यासाठी लावण्यात आले होते. भुसावळ पालिकेला अवार्ड जाहिर झाला असून, दिल्ली येथे हा पुरस्कार पालिकेला प्रदान करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज