म. टा. प्रतिनिधी, जळगाव
येथील जिल्हा कारागृहात कैद्यांच्या बॅरेकमध्ये आढळलेली रोकड तसेच कैदी आणि जेल प्रशासन यांच्यात झालेल्या वादप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती कारागृह महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. शुक्रवारी त्यांनी जळगाव उपकारागृहाची पाहणी केली. त्यानतंर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.
कारागृह महासंचालकांच्या दक्षता पथकाने जिल्हा कारागृहास अचानक भेट दिली असता बॅरेकमधील कैद्यांजवळ भाजीपाला, दुधाच्या पिशव्या, डाळ, तेल तसेच अन्य पदार्थाच्या वस्तू आढळल्या होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल पथकाने घेत तसा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला होता. काही दिवसांपूर्वी संशयित चिंग्या तसेच जेल प्रशासन कर्मचारी यांच्यात शाब्दिक वाद जेलमध्ये झाला होता. त्यानंतर मजल धक्काबुककीवर गेली होती. या घटनेची गंभीर दखल घेत जेलर सुनील कुवंर यांनी चिंग्यास ताबडतोब नाशिक सेंट्रल कारागृहात हलविण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व प्रकरणांची चौकशी करणार असल्याची माहिती महासंचालक डॉ. उपाध्याय यांनी दिली. ते म्हणाले, सात वर्षाच्या वर शिक्षा लागलेल्या लोकांना बेलवर सोडावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जेलमध्ये शिक्षा झालेला किंवा गंभीर गुन्ह्यातील आरोपीसाठीच जेल आहे. किरकोळ गुन्हेगारांना जेलमध्ये ठेऊन उपयोग नाही. बऱ्याच कैद्यांकडे
पैसे नसतात. त्यामुळे त्यांचा जामिन होत नाही.
येथील जिल्हा कारागृहात कैद्यांच्या बॅरेकमध्ये आढळलेली रोकड तसेच कैदी आणि जेल प्रशासन यांच्यात झालेल्या वादप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती कारागृह महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. शुक्रवारी त्यांनी जळगाव उपकारागृहाची पाहणी केली. त्यानतंर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.
कारागृह महासंचालकांच्या दक्षता पथकाने जिल्हा कारागृहास अचानक भेट दिली असता बॅरेकमधील कैद्यांजवळ भाजीपाला, दुधाच्या पिशव्या, डाळ, तेल तसेच अन्य पदार्थाच्या वस्तू आढळल्या होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल पथकाने घेत तसा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला होता. काही दिवसांपूर्वी संशयित चिंग्या तसेच जेल प्रशासन कर्मचारी यांच्यात शाब्दिक वाद जेलमध्ये झाला होता. त्यानंतर मजल धक्काबुककीवर गेली होती. या घटनेची गंभीर दखल घेत जेलर सुनील कुवंर यांनी चिंग्यास ताबडतोब नाशिक सेंट्रल कारागृहात हलविण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व प्रकरणांची चौकशी करणार असल्याची माहिती महासंचालक डॉ. उपाध्याय यांनी दिली. ते म्हणाले, सात वर्षाच्या वर शिक्षा लागलेल्या लोकांना बेलवर सोडावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जेलमध्ये शिक्षा झालेला किंवा गंभीर गुन्ह्यातील आरोपीसाठीच जेल आहे. किरकोळ गुन्हेगारांना जेलमध्ये ठेऊन उपयोग नाही. बऱ्याच कैद्यांकडे
पैसे नसतात. त्यामुळे त्यांचा जामिन होत नाही.