अ‍ॅपशहर

‘बिटरगुंटा’ टोळी गजाआड

येथील एलसीबीच्या पथकाने रविवारी मुसक्या आवळलेल्या बिटरगुंटा टोळीच्या स्त्री, पुरुषांना हिंदी, तमिळ आणि ख्रिश्चन भाषा अवगत आहे. तसेच स्थानिक भाषादेखील ते शिकत होते. तपास पथकाने तिघांकडून माहिती घेण्यासाठी भाषांतरकाराची मदत घेतली. भाषांतरकाराच्या मदतीने या टोळीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Maharashtra Times 24 Jul 2018, 5:00 am
भाषांतरकाराची मदत घेत पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bitergunta gang arrested by jalgaon police from pachora
‘बिटरगुंटा’ टोळी गजाआड


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

येथील एलसीबीच्या पथकाने रविवारी मुसक्या आवळलेल्या बिटरगुंटा टोळीच्या स्त्री, पुरुषांना हिंदी, तमिळ आणि ख्रिश्चन भाषा अवगत आहे. तसेच स्थानिक भाषादेखील ते शिकत होते. तपास पथकाने तिघांकडून माहिती घेण्यासाठी भाषांतरकाराची मदत घेतली. भाषांतरकाराच्या मदतीने या टोळीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव-दक्षिण भारतात राहणाऱ्या व संपूर्ण महाराष्ट्रात बॅग लांबविणाऱ्या एका मोठ्या बिटरगुंटा टोळीतील बाबू शंकरय्या सल्ला (वय ४०), मायकल जॉन नागराज (वय ४०), राजेश रवी सल्ला (वय २७), उदय किरण सल्ला (वय ४०), राजबाबू मायकल नागराज (वय २०), संजू धानेला बलाला (वय २५), जकिरिया देवदासबाबू सल्ला (वय २४), कल्पना किशोर कुनचाला (वय २८), मरियम अनाको सल्ला (वय ३८) आणि ज्योती येशबू गुज्जा (वय ३७, सर्व रा. कपराळा टिप्पा, ता. बिटरगुंटा, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश) या भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री पाचोऱ्यातील बाहेरपुरा परिसरातून अटक केली. पोलिसांनी भामट्यांकडून बॅग चोरीसाठी वापरणारे साहित्य, दीड लाखांची रोकड, ३ दुचाकी जप्त केल्या आहेत.

तपास पथकाला टोळीजवळ मुंबई परिसरातील पत्ता असलेले एक आधारकार्ड मिळून आले. पथकाने त्यानुसार त्यांची चौकशी केली असता संपूर्ण बिटरगुंटा टोळीचा मुख्य अड्डा मुंबई परिसर असल्याचे समजले. मुंबई परिसराची टोळीला सर्व माहिती आहे. हे भामटे पाचोरा शहरात गेल्या दीड महिन्यांपासून भाड्याने खोली घेऊन राहत होते. दरम्यान, पोलिसांना भाडेकरूबाबत न कळविल्याने घरमालक महिलेवर कारवाई करावी, अशा सूचना पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिल्या आहेत.

राज्यभरातील गुन्हे उघडकीस येणार
टोळीने जळगाव, धुळे जिल्ह्यात वीसपेक्षा जास्त गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या शिवाय अहमदनगर, मुंबई, पुणे येथील काही गुन्ह्यांमध्येदेखील ते संशयित आहेत. जळगाव शहरात दोन महिन्यांपूर्वी स्टेट बँकेच्या बाहेरून भादले नावाच्या व्यक्तीची २० लाख रुपये ठेवलेली बॅग चारचाकीतून लंपास केली. तसेच दीड वर्षापूर्वी एमआयडीसी हद्दीतून चारचाकीचे काच फोडून ५३ लाख रुपये असलेली बॅग लंपास झाली आहे. हे दोन्ही मोठे गुन्हे या टोळीने केले आहे का? याचादेखील तपास सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज