अ‍ॅपशहर

‘काँग्रेसमुळे विकास खुंटला’

मुस्लिम समाज हा ७० वर्षे काँग्रेसला समर्पित राहिल्याने समाजाचा विकास खुंटला आहे, असे मत भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी पत्रकार परिषदेत प्रतिपादन केले.

Maharashtra Times 18 Jul 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp minorities morcha state president jamal siddiqui qoutes on congress party in jalgaon
‘काँग्रेसमुळे विकास खुंटला’


मुस्लिम समाज हा ७० वर्षे काँग्रेसला समर्पित राहिल्याने समाजाचा विकास खुंटला आहे, असे मत भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी पत्रकार परिषदेत प्रतिपादन केले. सोमवारी (दि. १७) शहरात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत शे. अ. करीम, हाजी एजाज देशमुख, वैभव काला, अॅड. शहबाज शेख, डॉ. नजरूल इस्माईल, शब्बीर अली, इरफान नुरी उपस्थित होते.

भाजप कार्यकर्ते पंडित दिनदयाल जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक बुथ्‍ाच्या माध्यमातून घरोघरी शासनाच्या योजना पोहोचवणार आहेत. भाजपचे ७३,३०० बूथ असून, त्यात ३,५०० बूथ अल्पसंख्याकांचे आहेत. या माध्यमातून संघटना मजबूत केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

अल्पसंख्याक समाजबहुल असलेल्या ज्याठिकाणी बूथ नाहीत तेथे बनविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सिद्दिकी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर

हल्ले चढविले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज