म. टा. प्रतिनिधी, जळगाव
नगरपंचायतचे रिक्त मुख्याधिकारीपद तसेच अन्य अनेक पदे रिक्त आहेत, ती तातडीने भरली जावीत आणि जनतेच्या अडीअडचणी समस्या दूर व्हाव्यात, अन्यथा नगरपंचायतीला कुलूप ठोकले जाईल, असा इशारा नगरसेवकांनी प्रशासनाला दिला आहे. नायब तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनावर नगराध्यक्ष मुमताजबी बागवान, उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण, नगरसेवक दिनेश माळी, मधुकर राणे, अस्लम बागवान, विजय पालवे, सईद बागवान यांच्या सह्या आहेत. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी तातडीने बोदवडचा पाहणी दौरा करुन उपाययोजना आणि रिक्तपदे नियुक्ती करण्यासाठी पावलं उचलण्याची तजवीज करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
पदे रिक्त केव्हा भ्ारण्ाार?
नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून जनतेच्या भल्यासाठी एकही विकास काम वा मूलभूत सुविधांची पूर्तता झालेली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. मुख्याधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांनी एकट्याने झपाट्याने काही कामे सुरू केली. पण मध्येच त्यांची बढती आणि बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे.
नगरपंचायतचे रिक्त मुख्याधिकारीपद तसेच अन्य अनेक पदे रिक्त आहेत, ती तातडीने भरली जावीत आणि जनतेच्या अडीअडचणी समस्या दूर व्हाव्यात, अन्यथा नगरपंचायतीला कुलूप ठोकले जाईल, असा इशारा नगरसेवकांनी प्रशासनाला दिला आहे. नायब तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनावर नगराध्यक्ष मुमताजबी बागवान, उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण, नगरसेवक दिनेश माळी, मधुकर राणे, अस्लम बागवान, विजय पालवे, सईद बागवान यांच्या सह्या आहेत. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी तातडीने बोदवडचा पाहणी दौरा करुन उपाययोजना आणि रिक्तपदे नियुक्ती करण्यासाठी पावलं उचलण्याची तजवीज करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
पदे रिक्त केव्हा भ्ारण्ाार?
नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून जनतेच्या भल्यासाठी एकही विकास काम वा मूलभूत सुविधांची पूर्तता झालेली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. मुख्याधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांनी एकट्याने झपाट्याने काही कामे सुरू केली. पण मध्येच त्यांची बढती आणि बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे.