शरद पवार यांचा सरकारवर आरोप
म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला एकामागोमाग एक आश्वासने दिलीत. परंतु त्यांची पूर्तता केली नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. अवघ्या चार वर्षांत त्यांचा लबाडपणा जनतेच्या लक्षात आला असून, या लबाडांची सत्ता उलथविण्यास तयार रहा, असेही पवार म्हणाले. रविवारी भडगाव येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
कार्यक्रमाप्रसंगी शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर गेले मात्र तिथून कुठलीही गुंतवणूक भारतात आली नाही. मात्र, त्यांच्या प्रवास खर्चाचा भार जनतेला सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांना लागू केलेली कर्जमुक्तीची घोषणा फसवी होती. कर्जमाफीची प्रत्यक्षात अमंलबजावणी झाली नाही, असेही पवार यांनी सांगितले. फसलेल्या नोटबंदीमुळे रुपयाचे अवमूल्यन झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. महागाई, पेट्रोल, डिझेल गॅसची दरवाढ रोज करण्याचा विक्रम केंद्र सरकारने केला असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली.
कर्जबुडव्यांना अभय
केंद्र सरकारने लागू केलेल्या नोटबंदीचा फायदा मूठभर लोकांना झाला. परंतु, सामान्याचे मात्र कंबरडे मोडले. नोटबंदीमुळे सहकारी बँकांचे नुकसान झाले असून, बँकांना मदत करण्याऐवजी हजारो कोटींचे कर्ज बुडविणाऱ्या कर्जदारांना अभय देणाऱ्या बँकांना केलेली मदत हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. या राज्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नसून महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. विविध करांमुळे व्यापारीदेखील अडचणीत आला आहे. महिला असो वा विद्यार्थी सर्वच घटक हैराण झाले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
‘सहकार’ मोडण्याचा प्रयत्न
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. शेतकरी, व्यापारी मंत्रालयात येऊन आत्महत्या करीत आहेत. महागाईचा भडका उडाला आहे. सीमेवर रोज जवान शहीद होत आहेत, अशी टीका त्यांनी केली. सहकार क्षेत्रात अडचणी निर्माण करून ते मोडून काढण्याचे कारस्थान केले जात असल्याचे भुजबळ म्हणाले. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी मंत्री अरुण गुजराथी, गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, संजय वाघ, प्रशांत पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला एकामागोमाग एक आश्वासने दिलीत. परंतु त्यांची पूर्तता केली नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. अवघ्या चार वर्षांत त्यांचा लबाडपणा जनतेच्या लक्षात आला असून, या लबाडांची सत्ता उलथविण्यास तयार रहा, असेही पवार म्हणाले. रविवारी भडगाव येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
कार्यक्रमाप्रसंगी शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर गेले मात्र तिथून कुठलीही गुंतवणूक भारतात आली नाही. मात्र, त्यांच्या प्रवास खर्चाचा भार जनतेला सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांना लागू केलेली कर्जमुक्तीची घोषणा फसवी होती. कर्जमाफीची प्रत्यक्षात अमंलबजावणी झाली नाही, असेही पवार यांनी सांगितले. फसलेल्या नोटबंदीमुळे रुपयाचे अवमूल्यन झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. महागाई, पेट्रोल, डिझेल गॅसची दरवाढ रोज करण्याचा विक्रम केंद्र सरकारने केला असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली.
कर्जबुडव्यांना अभय
केंद्र सरकारने लागू केलेल्या नोटबंदीचा फायदा मूठभर लोकांना झाला. परंतु, सामान्याचे मात्र कंबरडे मोडले. नोटबंदीमुळे सहकारी बँकांचे नुकसान झाले असून, बँकांना मदत करण्याऐवजी हजारो कोटींचे कर्ज बुडविणाऱ्या कर्जदारांना अभय देणाऱ्या बँकांना केलेली मदत हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. या राज्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नसून महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. विविध करांमुळे व्यापारीदेखील अडचणीत आला आहे. महिला असो वा विद्यार्थी सर्वच घटक हैराण झाले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
‘सहकार’ मोडण्याचा प्रयत्न
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. शेतकरी, व्यापारी मंत्रालयात येऊन आत्महत्या करीत आहेत. महागाईचा भडका उडाला आहे. सीमेवर रोज जवान शहीद होत आहेत, अशी टीका त्यांनी केली. सहकार क्षेत्रात अडचणी निर्माण करून ते मोडून काढण्याचे कारस्थान केले जात असल्याचे भुजबळ म्हणाले. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी मंत्री अरुण गुजराथी, गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, संजय वाघ, प्रशांत पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.