अ‍ॅपशहर

बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

गेल्या सव्वा महिन्यापासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील कृष्णापुरी तांडा येथील रवींद्र रामसिंग चव्हाण या बेपत्ता तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. त्याचा मृतदेह गावाजवळील धरणातील नाल्याजवळ पुरलेल्या अवस्थेत मिळून आला. मित्रांनीच पार्टीच्या नावाखाली रवींद्रला घरातून घेऊन जात त्याचा घात केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Maharashtra Times 18 Jul 2018, 5:00 am
सव्वा महिन्याने गुन्हा उघडकीस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IMG-20180717-WA0039


म.टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

गेल्या सव्वा महिन्यापासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील कृष्णापुरी तांडा येथील रवींद्र रामसिंग चव्हाण या बेपत्ता तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. त्याचा मृतदेह गावाजवळील धरणातील नाल्याजवळ पुरलेल्या अवस्थेत मिळून आला. मित्रांनीच पार्टीच्या नावाखाली रवींद्रला घरातून घेऊन जात त्याचा घात केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाऊन येतो असे सांगून रवींद्र रामसिंग चव्हाण हा दि. ११ जून रोजी रात्री ८.३० वाजता गेला होता. परंतु, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. घरच्यांनी त्याचा सर्व नातवाईक व आजूबाजूच्या गावात शोध घेतला. परंतु, तो मिळून आला नाही. त्यांनतर मेहुणबारे पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी (दि. १७) दुपारी २ वाजता कृष्णापुरी धरणाखाली एका झाडाखाली मातीचा ढिगारा रवींद्रच्या कुटुंबीयांना दिसला. त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. ढिगारा उपसला असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. तो मृतदेह रवींद्रचाच असल्याचे स्पष्ट झाले. रवींद्र हा गावातील राहुल किसन जाधव याच्या बहिणीशी फोनवर बोलायचा. याचा राग राहुलच्या मनात राग होता. त्याने रवींद्रला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे राहुलवर रवींद्रच्या कुटुंबीयांचा संशय आहे. या प्रकरणी राहुल जाधवसह, सचिन पुंडलिक जाधव, अजय रामसिंग जाधव या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ करीत आहेत. रवींद्रच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज