चाळीसगाव ः तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी (दि. ९) जाहीर झाले. बहुतेक ठिकाणी मतदारांनी विकासाच्या आशेने तरुण उमेदवारांना निवडून देत गावाची सत्ता त्यांच्या हाती सोपविली. मतमोजणीवेळी उमेदवारांमध्ये धाकधूक, त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता तर निकाल जाहीर होताच गुलाल उधळत केलेला जल्लोष असे वातावरण पहावयास मिळाले. तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये आडगाव, उपखेड व शिंदवाडी येथील सरपंचपदांची निवड बिनविरोध झाली. आडगाव व उपखेड या दोन ग्रामपंचायती संपूर्ण बिनविरोध झाल्याने शिदवाडी, सांगवी, लोंजे, करजगाव, उंबरखेड, विसापूर, चिंचखेडे, डामरूण, वलठाण, पिंपळगाव म्हाळसा, अंधारी, गणेशपूर या ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली. निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची तहसील कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती.
धाकधूक, उत्सुकता अन् जल्लोष
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी (दि. ९) जाहीर झाले. बहुतेक ठिकाणी मतदारांनी विकासाच्या आशेने तरुण उमेदवारांना निवडून देत गावाची सत्ता त्यांच्या हाती सोपविली.
Maharashtra Times 10 Oct 2017, 4:00 am