अ‍ॅपशहर

‘चोसाका’चे लोढणे गळ्यात अडकवू नका

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्टवक्तेपणा चोपडेकरांना अनुभवायास मिळाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दादा, आपण अनेक साखर कारखाने उत्तम चालवितात असे सांगत आमचा चोसाका चालविण्याची विनंती केली.

Maharashtra Times 29 Dec 2017, 4:00 am
माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची स्पष्टोक्ती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chopda sugar factory issue mla ajit pawar at chopda
‘चोसाका’चे लोढणे गळ्यात अडकवू नका


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्टवक्तेपणा चोपडेकरांना अनुभवायास मिळाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दादा, आपण अनेक साखर कारखाने उत्तम चालवितात असे सांगत आमचा चोसाका चालविण्याची विनंती केली.

यावर आपल्या भाषणात अजित पवारांनी चोसाकावर कर्ज किती अशी विचारणा करीत शंभर कोटी कर्ज असलेला कारखाना चालविणे कठीण असल्याचे सांगत चोसाकाचे लोढणे आमच्या गळ्यात अडकवू नका?, असे सांगितले.

हा कारखाना बँक संचालकांना चालविण्यास मदत करते हे चांगले असून, तुम्ही बँक आणि कारखाना नीट सांभाळा, असा सल्लाही पवारांनी दिला. जास्त उतारा देणारा ऊस लागवड करा, त्यासाठी अद्यावत उत्तम शेती करा. चांगल्या उताऱ्याच्या उसाला जास्त भाव मिळू शकतो. चोसाकाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बँकांची व केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल. फार तर वसंतदादा श्युगर इन्स्टिट्यूटची मदत आपण मिळवू देऊ, अशी ग्वाही आमदार अजित पवार यांनी दिली. चोपडा येथील ओमशांती पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या उद््घाटनप्रसंगी गुरुवारी (दि. २८) पवार बोलत होते. उन्हात बसविणाऱ्याला सावलीत बसविणे हेच सहकाराचे काम असून, दुर्बलाला शक्ती देणारी सहकार चळवळ असल्याचे अध्यक्षस्थानावरून बोलताना अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले. सहकाराचे देणे देण्यासाठी मागेपुढे पाहू नका. असेही ते म्हणाले. प्रास्तविक चंद्रहास गुजराथी यांनी केले.

शेतकऱ्यांना न्याय का नाही?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण देण्यात वस्ताद असून, आजचे सरकार सहकाराशी दुजाभावाने वागत असल्याची आरोप त्यांनी केला. हे सरकार खासगी बँकांना प्रोत्साहन देत आहेत. उद्योगपतीची कोटींची कर्जे माफ करीत आहे. तोच न्याय शेतकर्‍यांना का नाही? हे बरं नाही, असा सूर शेवटी पवारांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. सध्या महागाई आभाळाला भिडली आहे, मात्र शेतमालाला भाव नाही. दुधाला दाम नाही. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी आजुबाजूला काय चाललंय याची जाणीव ठेवली पाहिजे, असेही पवार म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज