नंदुरबार: करोना विषाणूच्या साखळीनं राज्यातील ग्रामीण भागालाही विळखा घातला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आणखी तिघांना करोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणी अहवालातून स्पष्ट झालं आहे. एकूण ६६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी ६३ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.
राज्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही करोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. नंदुरबार जिल्ह्यातही करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात काल एकूण ६६ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी, ३ जण करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात अक्कलकुवा येथील २३ आणि ४८ वर्षीय महिला आणि शहादा येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या तिन्ही संशयितांना आधीच क्वारंटाइन करण्यात आलं होतं. हे तिघेही करोनाबाधित रुग्णाच्या संपर्क साखळीतील असल्याची माहिती मिळते. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे, शहादा येथील संपर्क साखळीतील आणखी नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
राज्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही करोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. नंदुरबार जिल्ह्यातही करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात काल एकूण ६६ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी, ३ जण करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात अक्कलकुवा येथील २३ आणि ४८ वर्षीय महिला आणि शहादा येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या तिन्ही संशयितांना आधीच क्वारंटाइन करण्यात आलं होतं. हे तिघेही करोनाबाधित रुग्णाच्या संपर्क साखळीतील असल्याची माहिती मिळते. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे, शहादा येथील संपर्क साखळीतील आणखी नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.