जळगाव: जळगाव जिल्ह्यात करोना संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंचा आकडाही वाढताच आहे. बुधवारी दिवसभरात जळगाव जिल्ह्यात २० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात यावल तालुक्यातील एका ६ वर्षीय बालिकेचा समावेश आहे. दरम्यान, २४ तासांत नव्याने १००६ रुग्णांची भर पडली असून त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने तो काहीसा दिलासा ठरला आहे. ( Coronavirus In Jalgaon Latest Update ) वाचा: मुंबईतील लससाठा जवळपास संपला!; आज ४० केंद्रे राहणार बंद आणि...
जिल्ह्यात करोना संसर्गाची स्थिती भीषण बनली आहे. दिवसभरात जळगाव शहर १७३, जळगाव ग्रामीण ४७, भुसावळ १३०, अमळनेर ६०, चोपडा ९७, पाचोरा ४७, भडगाव ११, धरणगाव ३३, यावल २५, एरंडोल ७३, जामनेर ३८, रावेर ७०, पारोळा २०, चाळीसगाव ५०, मुक्ताईनगर ९०, बोदवड ३५ आणि इतर जिल्ह्यातील ७ रुग्ण असे एकूण १००६ रुग्ण आढळून आले आहेत. तर ११२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १ लाख १९ हजार ९३४ इतकी झाली आहे तर १ लाख ७ हजार २६ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.
वाचा: राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवणार?; ३० एप्रिलला अंतिम निर्णय
बाधित २० रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात २४ तासांत २० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात यावल तालुक्यातील एका ६ वर्षीय बालिकेचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भुसावळ, यावल तालुक्यातील प्रत्येकी ३, जळगाव शहर, एरंडोल, जामनेर, पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी २ तर अमळनेर,चाळीसगाव, चोपडा, जळगाव, पारोळा व रावेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी पाचोरा तालुक्यात एका ४ वर्षीय बालिकेचा करोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ६ वर्षीय बालिका दगावल्याने चिंता वाढली आहे. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तरुण वर्गासह लहान मुलंही बाधित होत आहेत. त्यात काही ठिकाणी मूलं दगावली असल्याने आरोग्य यंत्रणेपुढे हे नवे आव्हान ठरले आहे.
वाचा: पंढरपूरचा निकाल रात्री ९ नंतरच येणार; निवडणूक अधिकारी म्हणाले...
जिल्ह्यात करोना संसर्गाची स्थिती भीषण बनली आहे. दिवसभरात जळगाव शहर १७३, जळगाव ग्रामीण ४७, भुसावळ १३०, अमळनेर ६०, चोपडा ९७, पाचोरा ४७, भडगाव ११, धरणगाव ३३, यावल २५, एरंडोल ७३, जामनेर ३८, रावेर ७०, पारोळा २०, चाळीसगाव ५०, मुक्ताईनगर ९०, बोदवड ३५ आणि इतर जिल्ह्यातील ७ रुग्ण असे एकूण १००६ रुग्ण आढळून आले आहेत. तर ११२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १ लाख १९ हजार ९३४ इतकी झाली आहे तर १ लाख ७ हजार २६ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.
वाचा: राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवणार?; ३० एप्रिलला अंतिम निर्णय
बाधित २० रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात २४ तासांत २० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात यावल तालुक्यातील एका ६ वर्षीय बालिकेचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भुसावळ, यावल तालुक्यातील प्रत्येकी ३, जळगाव शहर, एरंडोल, जामनेर, पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी २ तर अमळनेर,चाळीसगाव, चोपडा, जळगाव, पारोळा व रावेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी पाचोरा तालुक्यात एका ४ वर्षीय बालिकेचा करोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ६ वर्षीय बालिका दगावल्याने चिंता वाढली आहे. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तरुण वर्गासह लहान मुलंही बाधित होत आहेत. त्यात काही ठिकाणी मूलं दगावली असल्याने आरोग्य यंत्रणेपुढे हे नवे आव्हान ठरले आहे.
वाचा: पंढरपूरचा निकाल रात्री ९ नंतरच येणार; निवडणूक अधिकारी म्हणाले...