जळगाव : शहरातील जोशी पेठेतील तीन मोटारसायकली जाळल्याच्या घटनेनंतर कांचननगरातील चालकाच्या घरासमोर उभ्या असलेल्या रिक्षेवर कुठल्यातरी माथेफिरूने रॉकेल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी (दि. १३) पहाटे ३ वाजता उघडकीस आला. वेळीच प्रकार लक्षात आल्याने परिसरातील तरुणांनी रिक्षेची आग विझवली. या घटनेमुळे परिसरात मात्र खळबळ उडाली आहे. कांचननगरातील सद्गुरू किराणा स्टोअर्सजवळ सुरेंद्र उर्फ गुड्डू विजय हरदे हे रिक्षाचालक राहतात. त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच नवीन रिक्षा क्रमांक (एमएच १९, सीडब्ल्यू ०७९५) घेतली आहे. शनिवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान काही जणांनी रिक्षावर रॉकेल टाकून पेटवून दिले. तेथे असलेल्या तरुणांनी हा प्रकार पाहिला. मात्र, त्यांनी हटकल्यावर माथेफिरूने मोटारसायकलने पळ काढला. रिक्षाला लागलेली आग तरुणांनी विझवली. यात आगीत रिक्षाचे पुढील व मागील सिट पूर्णपणे जळून खाक झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून दुचाकी पेटविणे, दुचाकीतीन पेट्रोल चोरीस जाणे, सिटवर ब्लेड मारणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे वाहनधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यातदेखील नवीन जोशी कॉलनीत राहणाऱ्या तिघा जणांच्या दुचाकी पेटविण्यात आल्या होत्या.
कांचन नगरात रिक्षा जाळली
शहरातील जोशी पेठेतील तीन मोटारसायकली जाळल्याच्या घटनेनंतर कांचननगरातील चालकाच्या घरासमोर उभ्या असलेल्या रिक्षेवर कुठल्यातरी माथेफिरूने रॉकेल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी (दि. १३) पहाटे ३ वाजता उघडकीस आला.
Maharashtra Times 14 Oct 2018, 5:00 am