अ‍ॅपशहर

‘भारतात संशोधनाची स्थिती चिंताजनक’

देशाच्या एकूण उत्पन्नांचा अधिक खर्च ज्या देशात संशोधनावर केला जातो तो देश अधिक विकसित होतो. भारतात मात्र, संशोधनाची स्थिती चिंताजनक असल्याची खंत अटल बिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मोहनलाल छिपा यांनी आविष्कार संशोधन स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केली. स्पर्धेत एकूण ४६० विद्यार्थी सहभागी झाले असून ३७ मॉडेल्स २५३ पोस्टर्स यांचा समावेश आहे.

Maharashtra Times 13 Jan 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम curious condition for research in india
‘भारतात संशोधनाची स्थिती चिंताजनक’


देशाच्या एकूण उत्पन्नांचा अधिक खर्च ज्या देशात संशोधनावर केला जातो तो देश अधिक विकसित होतो. भारतात मात्र, संशोधनाची स्थिती चिंताजनक असल्याची खंत अटल बिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मोहनलाल छिपा यांनी आविष्कार संशोधन स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केली. स्पर्धेत एकूण ४६० विद्यार्थी सहभागी झाले असून ३७ मॉडेल्स २५३ पोस्टर्स यांचा समावेश आहे.

विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेला गुरुवार (दि. १२ ) पासून विद्यापीठात प्रारंभ झाला. कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील हे अध्यक्षस्थानी होते. या वेळी बीसीयुडी संचालक प्रा. पी. पी. माहुलीकर, समन्वयक प्राचार्य डी. एस. सूर्यवंशी, डॉ. प्रिती अग्रवाल, डॉ. सी. पी. सावंत, डॉ. एस. आर. चौधरी, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. एस. आर. कोल्हे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रा. छिपा म्हणाले की, इस्त्रायलसारखा छोटा देश सकल उत्पन्नाच्या ४.२७ टक्के खर्च संशोधनावर करतो. तर भारतात प्रती व्यक्ती ९ डॉलर खर्च होतो. भारतात १० लाख लोकसंख्येमागे केवळ १६४ लोक संशोधन करतात, अशीही आकडेवारी त्यांनी बोलताना दिली. प्राचीनकाळी भारताची विश्वगुरू म्हणून जगभर ओळख होती. इंग्रजांनी या देशावर राज्य केल्यावर भारताची संस्कृती आणि भाषा यांच्यावर त्यांनी घाला घातला. इंग्रजी शिक्षण पद्धतीत पदवीचा संबंध नोकरीशी जोडला गेला. त्यामुळे राष्ट्रभक्ती मागे पडली असे सांगून प्रा. छिपा यांनी भारताच्या पूर्वज्ञान संस्कृती आणि परंपरेचा तरुण पिढीने शोध घ्यावा, त्यावर संशोधन करावे, असेही आवाहन त्यांनी केले. कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी या स्पर्धांमधून उत्तम संशोधक निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. एकाग्रता, चिकाटी आणि संयम यांची संशोधनात गरज आहे, असे मत व्यक्त केले. समन्वयक प्रा. अनिल डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जी. ए. उस्मानी यांनी केले तर डॉ. एस. आर. कोल्हे यांनी आभार मानले. आज (दि. १३) दुपारी ४ वाजता स्पर्धेचा पारितोषिक वितरण होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज