अ‍ॅपशहर

निकाल प्राप्तीनंतरच ‘अमृत’बाबत निर्णय

अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची मंजूर निविदा औरंगाबाद खंडपीठाने अयोग्य ठरविली आहे. खंडपीठाचा सविस्तर निकाल अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही. निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे रमेश जैन यांनी सांगितले.

Maharashtra Times 11 Oct 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम decision about amrit only after getting results
निकाल प्राप्तीनंतरच ‘अमृत’बाबत निर्णय


अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची मंजूर निविदा औरंगाबाद खंडपीठाने अयोग्य ठरविली आहे. खंडपीठाचा सविस्तर निकाल अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही. निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे रमेश जैन यांनी सांगितले. अमृत योजनेबाबत खाविआचा काहीही संबंध नव्हता. परंतु, चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी मंगळवारी (दि. १०) पत्रकारांशी बोलताना दिले.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट तर आहेच परंतु लोकसहभागातून विकास कामे सुरू आहे. मेहरूण तलावाचे खोलीकरण, सुशोभीकरण, उद्यान, चौक सुशोभीकरणाची कामे सुरू असल्याचेही रमेश जैन यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकत्र आहेत. कुठलेही गट-तट किंवा मतभेद नाही, असे म्हणत येत्या वर्षभरात अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटारी आणि २५ कोटीतील कामे मार्गी लागतील, असा आशावाददेखील त्यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज