मुंबईत बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत मंजुरी
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
भुसावळ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातील दीपनगरातील नियोजित ६६० मेगावॅट प्रकल्पाला बुधवारी (दि. २५) मुंबईत झालेल्या बोर्ड डायरेक्टर्सच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मे. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीला थेट कार्यारंभ आदेश देवून काम सुरू केले जाणार आहे.
दीपनगरातील ६६० मेगावॅट सुपर क्रिटिकल कोळसाधिष्ठीत प्रकल्पाला २०११ मध्ये मंजुरी मिळाली होती. मे. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड या कंपनीला तब्बल पाच हजार कोटी रुपयांचे हे काम देण्यात आले होते. मात्र सर्वांत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बोर्ड डायरेक्टर बैठकीत अंतिम मंजुरी नसल्याने या प्रकल्पाचे काम थंड बस्त्यात अडकले होते. दरम्यान, बुधवारी मुंबईतील प्रकाशगड मुख्यालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्यानंतर आता कामास वेग येणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित या प्रगत प्रकल्पातील नवीन तंत्रज्ञानामुळे पाच टक्के कोळशाची बचत होणार आहे. तसेच उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. सोबतच कृषी औद्योगिक क्षेत्राला विजेची सुलभतेने उपलब्धता प्रकल्पातून निर्मित विजेचा अस्थिर आकार कमी राहणार आहे.
हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी
या मंजुरीनंतर येत्या पंधरवड्यातच मे. भेल कंपनीला कार्यारंभ आदेश देऊन या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. साधारण नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या कामामुळे परिसरातील हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी यापूर्वीच मिळाल्याने दीपनगरातील नियोजित ६६० मेगावॅट प्रकल्पाचे काम सुरू होण्यास आता कोणताही अडसर राहिलेला नाही. २०११ मध्ये मंजूर या प्रकल्पाचे काम सुरू होत नसल्याने आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा, तारांकित प्रश्न व लक्षवेधी प्रश्न मांडून सभागृहाचे लक्ष वेधले होते. प्रकल्पाचे काम होत नसल्यास शेतकऱ्यांना जमिनी परत द्याव्या, या त्यांच्या मागणीमुळे सरकारने तत्काळ देखल घेतली.
कोळसा साठ्याची उपलब्धता
महानिर्मितीने राज्यभरातील काही संच कालबाह्य झाल्याने बंद केले आहेत. या संचांचा राखीव कोळसा साठा दीपनगर केंद्रातील नियोजित ६६० मेगावॅट प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. वीजनिर्मिती संचांचा कोळसासाठा या प्रकल्पासाठी वापरण्याचे नियोजन बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत करण्यात आले. यासह प्रकल्पासाठी आवश्यक बाबी व पर्यावरणीय मंजुरीदेखील मिळाल्याने प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
भुसावळ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातील दीपनगरातील नियोजित ६६० मेगावॅट प्रकल्पाला बुधवारी (दि. २५) मुंबईत झालेल्या बोर्ड डायरेक्टर्सच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मे. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीला थेट कार्यारंभ आदेश देवून काम सुरू केले जाणार आहे.
दीपनगरातील ६६० मेगावॅट सुपर क्रिटिकल कोळसाधिष्ठीत प्रकल्पाला २०११ मध्ये मंजुरी मिळाली होती. मे. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड या कंपनीला तब्बल पाच हजार कोटी रुपयांचे हे काम देण्यात आले होते. मात्र सर्वांत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बोर्ड डायरेक्टर बैठकीत अंतिम मंजुरी नसल्याने या प्रकल्पाचे काम थंड बस्त्यात अडकले होते. दरम्यान, बुधवारी मुंबईतील प्रकाशगड मुख्यालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्यानंतर आता कामास वेग येणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित या प्रगत प्रकल्पातील नवीन तंत्रज्ञानामुळे पाच टक्के कोळशाची बचत होणार आहे. तसेच उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. सोबतच कृषी औद्योगिक क्षेत्राला विजेची सुलभतेने उपलब्धता प्रकल्पातून निर्मित विजेचा अस्थिर आकार कमी राहणार आहे.
हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी
या मंजुरीनंतर येत्या पंधरवड्यातच मे. भेल कंपनीला कार्यारंभ आदेश देऊन या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. साधारण नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या कामामुळे परिसरातील हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी यापूर्वीच मिळाल्याने दीपनगरातील नियोजित ६६० मेगावॅट प्रकल्पाचे काम सुरू होण्यास आता कोणताही अडसर राहिलेला नाही. २०११ मध्ये मंजूर या प्रकल्पाचे काम सुरू होत नसल्याने आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा, तारांकित प्रश्न व लक्षवेधी प्रश्न मांडून सभागृहाचे लक्ष वेधले होते. प्रकल्पाचे काम होत नसल्यास शेतकऱ्यांना जमिनी परत द्याव्या, या त्यांच्या मागणीमुळे सरकारने तत्काळ देखल घेतली.
कोळसा साठ्याची उपलब्धता
महानिर्मितीने राज्यभरातील काही संच कालबाह्य झाल्याने बंद केले आहेत. या संचांचा राखीव कोळसा साठा दीपनगर केंद्रातील नियोजित ६६० मेगावॅट प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. वीजनिर्मिती संचांचा कोळसासाठा या प्रकल्पासाठी वापरण्याचे नियोजन बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत करण्यात आले. यासह प्रकल्पासाठी आवश्यक बाबी व पर्यावरणीय मंजुरीदेखील मिळाल्याने प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.