अ‍ॅपशहर

पीडित कुटुंबाची संरक्षणाची मागणी

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात विहिरीत पोहले, म्हणून दोन अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण करणाऱ्यांपासून आमच्या कुटुंबाला धोका असल्याचे सांगत आपल्याला संरक्षण मिळावे, अशी मागणी पीडित मुलाच्या आर्इने शनिवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली.

Maharashtra Times 17 Jun 2018, 5:00 am
जामनेरमधील विहिरीत पोहल्याने मारहाणीचे प्रकरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम demand for the protection of the victims family in jamner wakadi to minister ramdas athwale
पीडित कुटुंबाची संरक्षणाची मागणी


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात विहिरीत पोहले, म्हणून दोन अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण करणाऱ्यांपासून आमच्या कुटुंबाला धोका असल्याचे सांगत आपल्याला संरक्षण मिळावे, अशी मागणी पीडित मुलाच्या आर्इने शनिवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी जामनेर तालुक्यातील वाकडी येथे भेट दिली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पीडित कुटुंबियांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली, तर सामाजिक न्याय खात्यामार्फत प्रत्येकी एक लाखाची मदतही आठवले यांनी जाहीर केली. ‘आरोपी आडदांड प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून आमच्या जीवितास धोका असून, आम्हाला संरक्षण मिळावे,’ अशी व्यथा पीडिताच्या आईने आठवले यांच्याकडे मांडली. यावर आठवले यांनी पोलिस प्रशासनास पीडित कुटुंबीयांना संरक्षण देण्याविषयी सूचना केल्या. ‘मुलांना झालेली मारहाण ही समाजमन सुन्न करणारी असून, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणी कुणीही राजकारण करू नये,’ असे आठवले यावेळी म्हणाले.

जामनेर तालुक्यातील वाकडी येथे अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री अजित कासम तडवी व शकूर सरदार तडवी (दोघे रा. वाकडी, ता. जामनेर) या दोन जणांना पहूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात संशयित आरोपींची संख्या चार झाली आहे.

आयोगाकडून विचारपूस
माजी राज्यमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनीही पीडित कुटुंबांना भेट दिली. राज्य अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे यांच्यासह सदस्यांनी शनिवारी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली व घटनास्थळी शेतातील दोन्ही विहिरींची पाहणी केली. त्यांनी पोलिसांना पीडितांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याच्या सूचनाही केल्या. महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाने कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी दोन्ही कुटुंबातील मुलांची शिक्षण, निवास आणि भोजन जबाबदारी घेतली आहे. विहिरीत पोहण्याच्या कारणावरून मागासवर्गीय समाजातील दोन मुलांना झालेल्या अमानुष मारहाणीचा समरसता मंचाने तीव्र निषेध केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज