अ‍ॅपशहर

अत्याचार प्रकरणाचे पडसाद

ज्ञानोपासक शिक्षण संस्थतील नूतन माध्यमिक विद्यालयात पाचवर्षीय बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरनाचे तीव्र पडसाद जनमानसात उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दोडाईचा कडकडीत बंद पाळला. दरम्यान, बंदला कोणतेही गालबोट न लागता बंद शांततेत पार पडला.

Maharashtra Times 22 Feb 2018, 4:00 am
चिमुकलीवरील घटनेनंतर दोंडाईचा बंद; आरोपीला अटकेची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dhule lead


म. टा. वृत्तसेवा, धुळे

ज्ञानोपासक शिक्षण संस्थतील नूतन माध्यमिक विद्यालयात पाचवर्षीय बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरनाचे तीव्र पडसाद जनमानसात उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दोडाईचा कडकडीत बंद पाळला. दरम्यान, बंदला कोणतेही गालबोट न लागता बंद शांततेत पार पडला.

दोंडाईचा शहरात पहिल्यांदाच दुपारी साडेचार वाजेपर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट पाहण्यास मिळाला. यावरून घटनेच्या प्रती शहराच्या नागरिकांमध्ये असलेली चीड लक्षात येते. पोलिसांनी तातडीने त्या नराधमास अटक करावी अशीच मागणी दुकानदारांनी केली आहे. दुकाने, भाजीपाला, व्यापारी व अन्य सर्व व्यवहार बंद होते. चीड आणणाऱ्या या निंदनीय घटनेचा निषेधार्थ पाळलेला बंद अभूतपूर्व होता.

दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात बालवाडीत शिकणाऱ्या बालिकेवर अज्ञात नराधमाने दि. ८ फेब्रुवारीला अमानूष अत्याचार केला होता. ही घटना चव्हाट्यावर आणू नये , पोलिसांत तक्रार देऊ नका. यासाठी पीडितेच्या आई-वडिलांना धमकविण्यात आले. परंतु, नातेवाईकांचा प्रयत्नाने जळगावात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. अज्ञात अत्याचारीविरोधात व संस्थाचालक माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख , डॉ. रवींद्र देशमुख, महेंद्र पाटील, प्रतीक महाले, नंदू सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाधिकारी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी शिक्षक महेंद्र पाटील यास अटक केली असून, त्यास तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

नागरिकांच्या मनात आक्रोश

या घटना नोंद होऊन बारा दिवस उलटूनही अद्याप अन्य संशयित फरार आहेत. या मोकाट आरोपींचा शोध घ्यावा. यासाठी बुधवारी (दि. २१) दोंडाईचा बंद पाळण्यात आला. बालिकेवर अत्याचार प्रकरणाचे पडसाद दोंडाईचासह अन्यत्र पडत असून, बालिकेचे पालक या घटनेने घाबरून गेले आहेत. याचा नागरिकांच्या मनात मोठा आक्रोश असून, यामुळेच दोंडाईचात पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला होता. मंगळवारी (दि. २०) दोंडाईचात विशाल मूक मोर्चा काढून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज