म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महापालिकेची सध्याच्या पाणीपुरवठा योजनेची वितरण व्यवस्था जीर्ण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करताना गळत्यांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे प्रति माणसी दररोज १३५ लिटर पाणी देणे अवघड असल्याने आता भुयारी गटारींची योजना महापालिकेला घेता येणार आहे. अमृतच्या माध्यमातून वितरण व्यवस्था सक्षम झाल्यानंतरच भुयारी गटारींची योजना सरकारकडून मंजूर केली जाऊ शकते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिकेचा अमृत योजनेत समावेशातून पाणीपुरवठा योजनेस मंजूरी मिळाली आहे. यात जलवाहिन्यांची नवीन वितरण व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील १९१ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही योजना एकाच राबविण्याबाबत पदाधिकारी आग्रही आहेत. भुयारी गटारी योजनेसाठी प्रतिमाणसी १३५ लिटर पाणीपुरठा करणे आवश्यक असते. जळगावात पाणी मुबलक असले तरी ही पाणीपुरवठा वितरण व्यवस्था ४० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. त्यामुळे त्यात सुमारे ७२ टक्के लॉसेस आहेत.
महापालिकेची सध्याच्या पाणीपुरवठा योजनेची वितरण व्यवस्था जीर्ण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करताना गळत्यांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे प्रति माणसी दररोज १३५ लिटर पाणी देणे अवघड असल्याने आता भुयारी गटारींची योजना महापालिकेला घेता येणार आहे. अमृतच्या माध्यमातून वितरण व्यवस्था सक्षम झाल्यानंतरच भुयारी गटारींची योजना सरकारकडून मंजूर केली जाऊ शकते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिकेचा अमृत योजनेत समावेशातून पाणीपुरवठा योजनेस मंजूरी मिळाली आहे. यात जलवाहिन्यांची नवीन वितरण व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील १९१ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही योजना एकाच राबविण्याबाबत पदाधिकारी आग्रही आहेत. भुयारी गटारी योजनेसाठी प्रतिमाणसी १३५ लिटर पाणीपुरठा करणे आवश्यक असते. जळगावात पाणी मुबलक असले तरी ही पाणीपुरवठा वितरण व्यवस्था ४० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. त्यामुळे त्यात सुमारे ७२ टक्के लॉसेस आहेत.