गेल्या पंधरा दिवसांत पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
यंदाही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावल्यानंतर पावसाने हुलकावणी दिली आहे. हवामान खात्याच्या सकारात्मक अंदाजावर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. आज पंधरा दिवस उलटूनही पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदा जूनच्या सुरवातीलाच पावसाने हजेरी लावली होती, तसेच विविध भागात तुरळक प्रमाणात मागील पंधरा दिवसांपासून पाऊस पडला. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली. ११ जूननंतर पाऊस आलेला नाही, त्यामुळे ज्यांच्या शेतात पेरणी झालेली आहेत ते शेतकरी अडचणीत सापडले. साधारणत: तीस हजार हेक्टरवर पेरणी झाली असल्याने ती रोपे या उन्हामुळे जळत आहेत. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे अंकुरित पिकांचे कोंब निघण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीला ज्वारी, मका, सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची पेरणी करण्यात आली आहे. तसेच कापसाची लागवडदेखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी तात्काळ पेरणी केली होती. मात्र काही ठिकाणी जास्त तर काही तालुक्यात पाऊसच पडला नाही. परिणामी, पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांनी आशा लावून पेरणी केली. मात्र गेल्या पंधरा दिवसांत पाऊस न झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी वर्ग हताश झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांचा अपवाद वगळता कोरडवाहू शेतकऱ्यांना या परिस्थितीत मोठा फटका बसणार आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट त्यांच्यासमोर उभे राहणार असल्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात केवळ ३२ टक्के पेरण्या
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३२.४० टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या असल्याचा अहवाल कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या पुन्हा एकदा लांबल्या आहेत. खरिप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ लाख ४४ हजार हेक्टरपैकी २ लाख ७३ हजार हेक्टर म्हणजेच ३२.४० टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात जामनेर तालुक्यात सर्वाधिक ७५.९ टक्के पेरण्या झाल्या असून, बोदवड तालुक्यात सर्वात कमी २.९७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारकडून कर्जमाफीच्या केवळ घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. दुसरीकडे पावसानेदेखील शेतकऱ्यांना आकाशाकडे बघायला भाग पाडले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा एकदा दुबार पेरणीचे संकट ओढावते की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
यंदाही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावल्यानंतर पावसाने हुलकावणी दिली आहे. हवामान खात्याच्या सकारात्मक अंदाजावर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. आज पंधरा दिवस उलटूनही पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदा जूनच्या सुरवातीलाच पावसाने हजेरी लावली होती, तसेच विविध भागात तुरळक प्रमाणात मागील पंधरा दिवसांपासून पाऊस पडला. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली. ११ जूननंतर पाऊस आलेला नाही, त्यामुळे ज्यांच्या शेतात पेरणी झालेली आहेत ते शेतकरी अडचणीत सापडले. साधारणत: तीस हजार हेक्टरवर पेरणी झाली असल्याने ती रोपे या उन्हामुळे जळत आहेत. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे अंकुरित पिकांचे कोंब निघण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीला ज्वारी, मका, सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची पेरणी करण्यात आली आहे. तसेच कापसाची लागवडदेखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी तात्काळ पेरणी केली होती. मात्र काही ठिकाणी जास्त तर काही तालुक्यात पाऊसच पडला नाही. परिणामी, पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांनी आशा लावून पेरणी केली. मात्र गेल्या पंधरा दिवसांत पाऊस न झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी वर्ग हताश झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांचा अपवाद वगळता कोरडवाहू शेतकऱ्यांना या परिस्थितीत मोठा फटका बसणार आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट त्यांच्यासमोर उभे राहणार असल्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात केवळ ३२ टक्के पेरण्या
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३२.४० टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या असल्याचा अहवाल कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या पुन्हा एकदा लांबल्या आहेत. खरिप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ लाख ४४ हजार हेक्टरपैकी २ लाख ७३ हजार हेक्टर म्हणजेच ३२.४० टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात जामनेर तालुक्यात सर्वाधिक ७५.९ टक्के पेरण्या झाल्या असून, बोदवड तालुक्यात सर्वात कमी २.९७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारकडून कर्जमाफीच्या केवळ घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. दुसरीकडे पावसानेदेखील शेतकऱ्यांना आकाशाकडे बघायला भाग पाडले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा एकदा दुबार पेरणीचे संकट ओढावते की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.