अ‍ॅपशहर

एकनाथ खडसे थेट बोलले; शिवसेना पक्षाचे दोन तुकडे होण्यामागे घेतले या व्यक्तीचे नाव

Eknath Khadse: शिवसेनेतील सत्ता संघर्षावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. जळगावातील NCPच्या कार्यालयात ते बोलत होते.

| Edited byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Oct 2022, 5:10 pm
जळगाव: शिवसेना पक्षाची सध्यास्थिती जी आहे यात उद्धव ठाकरेंनी काय केला आणि एकनाथ शिंदे यांनी काय केलं, अशा प्रकारे एकमेकांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही. धनुष्य बांधला मोडलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. यात काही चूका उद्धव ठाकरे यांच्या असतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ठाकरेंना लगावला आहे. जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आज सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Eknath Khadse


पक्षप्रमुख म्हणून चुका होत राहतात काही चुका या उद्धव ठाकरे यांच्याकडूनही झाल्या असतील. मात्र एखादी चूक एवढी मोठी नसावी की, ज्यामुळे पक्ष संपवून टाकावा. आता तेही संपले आणि तुम्ही संपले, अशी स्थिती निर्माण होता कामा नये. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे आपण सर्वजण आशेने पाहतो आहे. मात्र न्यायालय सुद्धा काही वेगळा निर्णय देईल, असे वाटत नाही असेही मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

वाचा- घरी जाणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; बसच्या खिडकीतून डोकावण्याची केली चूक

शिवसेनेत दोघांच्या भांडणामुळे...

बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मेहनतीने शिवसेना राज्यात उभी केली, त्यांच्याच मेहनतीमुळे धनुष्यबाणाला एक वेगळी प्रतिष्ठाही संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली. वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरे यांची जी पुण्याई होती त्या शिवसेनेचे दोघांच्या भांडणामुळे दोन तुकडे झाले असून शिवसेना ही दुभंगली गेली आहे. हे हे राज्याच्या दृष्टीने ही योग्य नाही व शिवसेनेच्या दृष्टीने ही योग्य नाही. मात्र दुसरीकडे यामुळे भाजपला मजबूत होण्याची संधी आहे, असेही मत एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केले.

वाचा- टी-२० वर्ल्डकपच्या आधी भारताला मिळाली गुड न्यूज; वॉर्म अप मॅचमधील विजयात गोलंदाजांनी केली कमाल

...त्यामुळे राज्याचा विकास मागे पडतोय

दोन पक्ष राज्यात प्रत्येक पक्ष आपसात भांडत राहिले, आपण एकमेकांना शत्रू सारख मानत राहिले तर दुसरीकडे यामुळे राज्याच्या विकासावर त्याचा स्वाभाविकपणे परिणाम होतो. पक्षांतर्गत वाद असतात, व्यक्तिगत मतभेद असू शकतात, परंतु विकासासाठी प्रश्न घेवून एकत्र येण्याची भूमिका बजावली पाहिजे, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलाच जोडून वेदांत प्रकल्पाचे उदाहरण दिले. व्यक्तिगत दुश्मनीच खुन्नसच राजकारण सुरू आहे व त्यामुळे विकास मागे पडत असल्याची टीका सुद्धा यावेळी एकनाथ खडसे यांनी केली.

शिवसेना संपवण्यासाठी भाजप सत्तेचा दुरुपयोग करून ईडी , सीबीआय प्रमाणे निवडणूक आयोगाचाही दुरुपयोग करत असल्याचा प्रश्न विचारला असता त्यावर बोलणे एकनाथ खडसे यांनी केले.

महत्वाचे लेख