अ‍ॅपशहर

खडसेंची 'मन की बात' उघड! जयंत पाटलांचे 'ते' ट्वीट केले रीट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ट्वीट रीट्वीट करून एकनाथ खडसे यांनी आज अखेर पुढील वाटचालीचा मेसेज दिला.

Authored byप्रविण चौधरी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Oct 2020, 12:34 pm
जळगाव: भाजप नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. यासंदर्भात अश्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे एक ट्वीट त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून केले होते. जयंत पाटील यांचे तेच ट्वीट भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले. त्यामुळे खडसे यांनी एकप्रकारे भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याचे अप्रत्यक्ष संकेतच दिले आहेत. अर्थात, खडसे यांनी हे ट्वीट अवघ्या तासाभरात डिलिट केल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Eknath Khadse


जयंत पाटील यांनी ट्विटरवर केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की 'आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील. कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असे वाटले होते. मात्र, यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला'. अशी टीका जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटद्वारे नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती.

वाचा: भाऊ, तुम्ही बांधाल तेच तोरण!; खडसेंच्या पोस्टरवरून कमळ गायब

विशेष म्हणजे, भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांचे ट्वीट रीट्वीट केले. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश लवकरच होईल, असा अंदाज बांधला जात आहे. खडसेंनी आतापर्यंत कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका-टिप्पणी किंवा नाराजी व्यक्त केलेली नव्हती. परंतु, त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू असतानाच त्यांनी प्रथमच थेट नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केल्याने चर्चा रंगली आहे.

वाचा: हीच ती वेळ! खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज