अ‍ॅपशहर

मंत्र्यांच्या ‘फोन’मुळे परिसर मोकळा

रेल्वे स्थानकासमोर रात्री उशिरापर्यंत हातगाड्या, टपऱ्या चालू असल्याने कायम कुरबुरी होत असतात. याचा प्रत्यय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही आला. याबाबत त्यांनी फोन केल्यावर पोलिस दलाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. विनाकारण रेल्वेस्थानकाजवळ येणाऱ्या वाहन चालकांसह परिसरात हातगाड्या लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Maharashtra Times 23 Mar 2017, 4:00 am
पोलिसांकडून बेशिस्त वाहनांवर, मनपाची अतिक्रमणावर कारवाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम encraochment issue at jalgaon railway station
मंत्र्यांच्या ‘फोन’मुळे परिसर मोकळा


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

रेल्वे स्थानकासमोर रात्री उशिरापर्यंत हातगाड्या, टपऱ्या चालू असल्याने कायम कुरबुरी होत असतात. याचा प्रत्यय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही आला. याबाबत त्यांनी फोन केल्यावर पोलिस दलाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. विनाकारण रेल्वेस्थानकाजवळ येणाऱ्या वाहन चालकांसह परिसरात हातगाड्या लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या कारने जळगाव रेल्वेस्थानकावर मंगळवारी (दि. २१) रात्री आले. मुंबई येथे विदर्भ एक्सप्रेसने जात असल्याने ते रेल्वेस्थानकावर आले होते. त्याचे वाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून वळण घेत असताना एका दुचाकीचा कट त्यांच्या वाहनाला लागला. यावरून दुचाकी चालकाने कारवरील चालकाशी किरकोळ वाद घातला. यानंतर जलसंपदामंत्र्यांनी पोलिस अधीक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये उशिरापर्यंत खाद्यपदार्थांच्या चार हातगाड्या पोलिसांनी जप्त केल्या. उशीरापर्यंत अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज