अ‍ॅपशहर

समांतर रस्त्यावरील अतिक्रमण ‘जैसे थे’

महामार्ग प्राधिकरण व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी महिन्याअखेर महामार्ग व समांतर रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी दोन दिवस मोहीम राबविण्यात आली होती. या कारवाईला दहा दिवस उलटत नाही तोच काढलेल्या टपऱ्या, हातगाड्या पुन्हा रस्त्यावर आल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोहिमेचे श्रम व खर्च पूर्ण पाण्यात गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

Maharashtra Times 10 Mar 2017, 4:00 am
मनपाच्या मोहिमेवर पाणी; टपऱ्या, हातगाड्या रस्त्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम encraochment on service road at jalgaon
समांतर रस्त्यावरील अतिक्रमण ‘जैसे थे’


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महामार्ग प्राधिकरण व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी महिन्याअखेर महामार्ग व समांतर रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी दोन दिवस मोहीम राबविण्यात आली होती. या कारवाईला दहा दिवस उलटत नाही तोच काढलेल्या टपऱ्या, हातगाड्या पुन्हा रस्त्यावर आल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोहिमेचे श्रम व खर्च पूर्ण पाण्यात गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

शहरातील समांतर रस्त्यांसाठी महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) दि. २७ व २८ फेब्रुवारीला महामार्गावरील अतिक्रमण काढण्याच्या निर्णय घेतला होता. त्यासाठी मोजणी पूर्ण करण्यात आल्यानंतर महापालिका व महामार्ग प्राधिकरणाकडून खोटेनगर ते थेट कालंका माता मंदिर, खेडी परिसर या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमणात आलेल्या हॉटेल्सच्यासमोरील जागा, रस्त्यावरील पोल, बोर्ड, टपऱ्या काढण्यात आल्या होत्या.

मोहीम झाल्यानंतर केवळ दहा दिवसांतच पुन्हा या ठिकाणाहून काढलेल्या टपऱ्या, हातगाड्या व खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या तसेच शेड पुन्हा रस्त्यावर आले आहेत. ज्याच्या टपऱ्या जप्त केल्या होत्या त्यांनी नवीन टपऱ्या तर ज्यांची पक्की बांधकामे पाडण्यात आली होती. त्यांनी हातगाड्या व टपऱ्या पुन्हा या जागेवर लावल्याने समांतर रस्त्यांना पुन्हा अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज