अ‍ॅपशहर

‘अतिक्रमणाविरूद्ध हरित लवादाकडे जाणार’

यावल अभयाण्यातील पाल रेंजमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, त्यामुळे वन्यजीवन उदध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या अतिक्रमाणांच्या विरोधात सातपुडा बचाव समिती हरित लवादाकडे दाद मागणार असल्याची माहिती सातपुडा बचाव समितीचे डॉ. अभय उजागरे यांनी पत्रकार दिली.

Maharashtra Times 26 Jul 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम encroachment in forest land
‘अतिक्रमणाविरूद्ध हरित लवादाकडे जाणार’


यावल अभयाण्यातील पाल रेंजमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, त्यामुळे वन्यजीवन उदध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या अतिक्रमाणांच्या विरोधात सातपुडा बचाव समिती हरित लवादाकडे दाद मागणार असल्याची माहिती सातपुडा बचाव समितीचे डॉ. अभय उजागरे यांनी पत्रकार दिली.

डॉ. अभय उजागरे यांनी सांगितले की, पाल रेंजमधील २८, २९ आणि कक्ष ५४ , ६४ मध्ये नव्याने अतिक्रमण झाले आहे. वनदावे विषयांकडे महसूलचे अधिकारी गांभीर्याने बघत नाहीत. अवैध वनदावे हे वैध करण्याची खेळी सुरू असल्याचा आरोपही उजागरे यांनी केला. वनजमिनींवरींल अतिक्रमणामुळे वाघांचा अधिवास धोक्याची येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. वनहक्क कायद्यानुसार अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांना क्रिटीकल वाइल्ड लाइफ हॅबिटॅटचा दर्जा देण्याची तरतूद आहे. या तरतुदीकडे सर्व शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत यावल अभयारण्याला क्रिटीकल वाइल्ड लाइफ हॅबिटॅटच्या दर्जा दिला जात नाही तोपर्यंत सर्व वैयेक्तिक वनदावे रद्द करण्यात यावे, अशी मागणी डॉ. अभय उजागरे यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज