अ‍ॅपशहर

‘बारामतीत जाऊन रहावेसे वाटते’

‘माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात अनेक नवीन संशोधन करीत बारामतीमध्ये विकासाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यामुळे आपण कार्यकर्त्यांना तेथील कृषी विकास पाहण्याचे आवाहन करत असतो. याच विकासामुळे आपल्यालाही बारामतीत जाऊन रहावेसे वाटते’, असेही मत भाजप नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

Maharashtra Times 11 Jan 2018, 4:00 am
जळगाव : ‘माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात अनेक नवीन संशोधन करीत बारामतीमध्ये विकासाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यामुळे आपण कार्यकर्त्यांना तेथील कृषी विकास पाहण्याचे आवाहन करत असतो. याच विकासामुळे आपल्यालाही बारामतीत जाऊन रहावेसे वाटते’, असेही मत भाजप नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ex minister eknath khadse want to stay in baramati due to agriculture development
‘बारामतीत जाऊन रहावेसे वाटते’


बुधवारी रावेर येथे श्रमसाधना केळी प्रोड्यूसर कंपनीचे उद्‌घाटन आमदार खडसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘मी ४० वर्षांपासून या पक्षात आहे, मात्र उद्याचे काही सांगता येत नाही. आपण आणि अजितदादा पवार तातडीने निर्णय घेतात तसे अन्य मंत्री का घेत नाहीत, ते पाऊल मागे का घेतात असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करतात असे सांगत शरद पवार यांच्या धोरणाची प्रशंसा केली.

सध्या शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था वाईट झालेली आहे. मध्यस्थ, दलाल, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत आहे. शेतीमालाचा दर्जा, उत्पादन, तसेच बाजारपेठेत शेतीमालाला भाव मिळणे शेतकऱ्यांच्या आवाक्यात नाही. केळीला बाजारपेठ मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा अधिक भाव मिळवून दिला पाहिजे. ज्येष्ठ नेते शरद पवार जाणते नेते आहेत. त्यांनी बारामतीमध्ये उभारलेल्या संस्थांमधून चांगले परिणाम दिसून आले म्हणून आपण कृषिमंत्री असतांना त्या संस्थांना मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज