अ‍ॅपशहर

शेतकऱ्याने मिळवला उणे उत्पन्नाचा दाखला!

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील शेतकऱ्याने शेतीच्या खर्च व उत्पन्नाचे पुरावा जोडून त्याचा ताळेबंद मांडत तहसील कार्यालयातून चक्क १ लाख ९६ हजार ६६७ रुपयांच्या उणे उत्पन्नाचा दाखल मिळविला आहे.

Maharashtra Times 11 Oct 2017, 4:00 am
शेतकऱ्यांच्या व्यथेवर शिक्कामोर्तब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmer earned a low income certificate at amalner
शेतकऱ्याने मिळवला उणे उत्पन्नाचा दाखला!


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील शेतकऱ्याने शेतीच्या खर्च व उत्पन्नाचे पुरावा जोडून त्याचा ताळेबंद मांडत तहसील कार्यालयातून चक्क १ लाख ९६ हजार ६६७ रुपयांच्या उणे उत्पन्नाचा दाखल मिळविला आहे. शेतकरी हिरालाल पाटील यांनी पुराव्यासह पाठपुरावा करून हा दाखल मिळविला असून, शेतीत केलेला खर्च व पिकांना मिळालेला भाव लक्षात घेता शेतकऱ्याला प्रचंड तोटा येत आहे. शेतकऱ्यांच्या या व्यथेवरच या घटनेमुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

मंगरूळ येथील हिरालाल पाटील यांची शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांच्या शेतीतून निघणारे उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी आहे. सरकारने पिकांना जाहीर केलेले हमीभाव परवडणारे नाहीत. शेतकऱ्यांना उत्पन्न कमीच नव्हे तर खर्चापेक्षादेखील कमी आहे, या बाबी कागदोपत्री सिद्ध करण्यासाठी हिरालाल पाटील यांनी अमळनेर तहसीलदार कार्यालयात अर्ज केला. त्यांनी या अर्जाद्वारे वजा उत्पन्नाचा दाखल देण्याचीही मागणी केली आहे.

हिरालाल पाटील यांनी केवळ मौखिक माहिती देऊनच उणे उत्पन्नाचा दाखला मागितला नाही. तर, त्यांनी त्यांनी शेतीत पिके घेण्यासाठी केलेले खर्च, त्यातून मिळालेले उत्पन्न व पिकांना मिळालेला भाव यांचे पुरावे जोडून त्यांना तब्बल १ लाख ९६ हजार ६६७ रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. सुरुवातीला पाटील यांची मागणी ऐकून प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी गोंधळून गेले होते. सुरुवातीला नकार देणाऱ्या प्रशासनाने हिरालाल पाटील यांनी मागणी लावून धरल्याने त्यांची दखल घेतली. त्यांचा अर्ज व पुराव्याची कागदपत्रे बघून अमळनेरचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी त्यांना उणे उत्पन्नाचा दाखल दिला आहे.

सरकारकडे लाभ मागणार

उत्पन्नाचा दाखल देण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये तशी तरतूद नसल्याने स्वतंत्र पत्राच्या माध्यमातून पाटील यांना हा दाखल देण्यात आला आहे. या उणे उत्पन्नाचा दाखल्याचा आधार घेवून हिरालाल पाटील आता सरकारकडे शेतीत नुकसान झाल्याने सांगून लाभाची मागणी करणार आहेत. उणे उत्पन्नाचा दाखल मिळविण्याची ही राज्यातील एकमेव घटना असण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज