अ‍ॅपशहर

पारोळ्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू?

म्हसवे (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २६) दुपारी घडली. वासुदेव श्रावण पाटील (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, उष्माघाताने मृत्यू झाल्याची या वर्षातील ही पहिलीच घटना आहे.

Maharashtra Times 27 Mar 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers death due to heat at parola district jalgaon
पारोळ्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू?


म्हसवे (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २६) दुपारी घडली. वासुदेव श्रावण पाटील (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, उष्माघाताने मृत्यू झाल्याची या वर्षातील ही पहिलीच घटना आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत गेला आहे. जळगावच्या तापमानाचा पाराही ४० अंशांपार गेला आहे. यामुळे उष्मा वाढला आहे. म्हसवे येथील वासुदेव पाटील हे सोमवारी दुपारी शेतात काम करीत असतानाच त्यांना अचानक चक्कर आले. त्यांना तत्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान वासुदेव पाटील यांचा मृत्यू झाला. शरीरातील पाण्याचे कमी प्रमाण झाल्याने उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. वासुदेव पाटील यांच्या मृत्यूची पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज