अ‍ॅपशहर

शेतकरी कर्जमाफीसाठी मंत्रालयावर पायी दिंडी

जिल्हयातील शेतकरी ७/१२ उताऱ्यावर आत्महत्या करणार नाही, असे शपथपत्र लिहून कर्जमाफी मागणार आहे. शेतकरी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्रित करून जळगाव ते मंत्रालय पायी दिंडी काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार व डॉ. राधेश्याम चौधरी यांनी रविवारी (दि. १९) पत्रकार परिषदेत दिली.

Maharashtra Times 20 Mar 2017, 4:00 am
शेतकरी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जळगावी आयोजन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers long march from jalgaon to mantralay mumbai
शेतकरी कर्जमाफीसाठी मंत्रालयावर पायी दिंडी


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जिल्हयातील शेतकरी ७/१२ उताऱ्यावर आत्महत्या करणार नाही, असे शपथपत्र लिहून कर्जमाफी मागणार आहे. शेतकरी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्रित करून जळगाव ते मंत्रालय पायी दिंडी काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार व डॉ. राधेश्याम चौधरी यांनी रविवारी (दि. १९) पत्रकार परिषदेत दिली.

अस्मानी व सुलतानी संकटामुळे मागील ४-५ वर्षांपासून शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पावेळी शेतकरी कर्जमाफी होईल, असे चित्र असतांनादेखील कर्जमाफीचा निर्णय झाला नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधकांसह सत्ताधारी शेतकरी कर्जमाफीची मागणी करीत आहे. कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य शेतकऱ्यांसाठी अवमान करणारे आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्येच्या हमी पेक्षा यावर्षी चांगला पाऊस, बि-बियाणे, खतांची हमी, विजपुरवठा वेळेवर मिळेल याची हमी द्यावी. तसेच पंतप्रधान मोदी उत्तरप्रदेशात कर्जमाफी देत आहे. तर महाराष्ट्रात काय अडचणी आहे, असा सवालदेखील यावेळी उपस्थित करण्यात आला.

शेतकऱ्याला अर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांची पतमर्यादा ठरवली पाहिजे, त्याला बिनव्याजी कर्ज द्यावे, हेक्टरी १ लाख रुपये कर्ज द्या, अशी मागणीही संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कैवारी म्हणविणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात कर्जमाफी करून दाखवावी, असे आवाहन डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केली. तसेच कर्जमाफीसाठी काढण्यात येणाऱ्या पायी दिंडीसाठी प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधी नेमणार असल्याची माहिती यावेळी डॉ. चौधरी यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज