अ‍ॅपशहर

कांद्याच्या भावावरून लिलाव बंद

कांद्याला भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी चाळीसगाव बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडले. त्यामुळे रविवारी (दि. २१) चार तास लिलाव बंद होते. बाजार समितीचे सचिव तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून समजूत काढली. त्यानंतर नवीन कांद्याला सर्वाधिक १९०० व जुन्या कांद्याला १४०० रुपये भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. अखेर चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दुपारी पुन्हा कांदा लिलाव सुरू करून समितीत रविवारी ७० ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली.

Maharashtra Times 22 Oct 2018, 5:00 am
चाळीसगाव मार्केटमध्ये शेतकरी आक्रमक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chalisgaon news


म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

कांद्याला भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी चाळीसगाव बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडले. त्यामुळे रविवारी (दि. २१) चार तास लिलाव बंद होते. बाजार समितीचे सचिव तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून समजूत काढली. त्यानंतर नवीन कांद्याला सर्वाधिक १९०० व जुन्या कांद्याला १४०० रुपये भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. अखेर चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दुपारी पुन्हा कांदा लिलाव सुरू करून समितीत रविवारी ७० ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली.

कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर लिलावात भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. आपली फसवणूक होत असल्याचे वाटल्याने रविवारी (दि. २१) सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी उप बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला ट्रॅक्टर आडवे लावून कांदा लिलाव बंद पाडले.

दरम्यान, रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बाजार समितीचे सचिव अशोक पाटील हे काही कर्मचाऱ्यांसोबत समितीत आले. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांनी इतर ठिकाणच्या बाजार समितीप्रमाणे भाव देण्याची मागणी केली असता सचिव पाटील यांनी राहुरी बाजार समितीत फोन लावून रविवारच्या भावाबाबत विचारणा केली. फोनचा स्पीकर सुरू करून भाव ऐकवित राहुरी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी कांद्याच्या प्रतवारीनुसार १ हजार पासून १७०० रुपयांपर्यंत भाव दिला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे या बाजारभावाप्रमाणे भाव देण्याचे निश्चित झाल्यानंतर दुपारी लिलावास पुन्हा सुरुवात करण्यात आली. दुपारी बाजार समितीचे सभापती रविंद्र पाटील, उपसभापती महेंद्र पाटील तसेच जेष्ठ संचालक प्रदीप देशमुख यांनीदेखील शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांची समजूत घातल्यानंतर कांदा लिलावास सुरुवात करण्यात आली.

या आहेत मागण्या...
बाहेरच्या बाजार समित्यांकडून २१०० रुपयांच्यावर भाव दिला जात असताना येथे मात्र ११०० ते १२०० रुपये भाव दिला जात आहे. येथे ३०० रुपयांपासून लिलावात बोली लावली जात आहे. शेतकऱ्यांचे म्हणने ऐकून घेतले जात नाही. व्यापारी आपापसात मिलीभगत करून भाव ठरवतात. शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असून इतर ठिकाणच्या बाजार समितींप्रमाणे भाव द्यावे. ऑनलाइन भाव काढावे, यासारख्या मागण्या करीत शेतकऱ्यांनी लिलाव रोखून धरला.

इतर ठिकाणच्या मार्केटमध्ये १००० ते १७०० रुपयांपर्यंत भाव आहे. आपल्या येथेही सरासरी १५०० रुपयांपर्यंत भाव असून, शेतकऱ्यांनी समजून घ्यावे. लिलाव अचानक बंद पडल्याने व्यापारी घाबरल्याने निघून गेले.
- अशोक पाटील, सचिव बाजार समिती

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज