अ‍ॅपशहर

नवीन वाट निर्माण करून मार्ग काढा

पराभवाची चर्चा करत बसण्यापेक्षा विजयाला महत्त्व देऊन नवीन वाट निर्माण करून मार्ग काढा व यशस्वी व्हा, असा सल्ला व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Maharashtra Times 11 Jun 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम find ways by creating a new route
नवीन वाट निर्माण करून मार्ग काढा


पराभवाची चर्चा करत बसण्यापेक्षा विजयाला महत्त्व देऊन नवीन वाट निर्माण करून मार्ग काढा व यशस्वी व्हा, असा सल्ला व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दर्जी फाउंडेशनकडून शनिवारी कांताई सभागृहात केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यशस्वी गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, उद्योजक श्रीराम पाटील, युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण प्रांजल पाटील, सौरभ सोनवणे, कुलदीप सोनवणे, नीलम बाफणा, गोपाल दर्जी उपस्थित होते.

कामातील प्रत्येक श्वासाशी आपल्या ध्यासाची नाड जोडली गेली पाहिजे. तसेच ध्यासाच्या मार्गावर काही वेळा अपयश येईलही मात्र ते अपयश आल्यावर खचू नका, असेही बानगुडे पाटील म्हणाले. अनेक यशस्वी व्यक्तींच्या जीवनातदेखील अपयश आले मात्र ते कधीही अपयश आल्यावर खचले नाही.

ध्येयाशी अर्जुनासारखे प्रामाणिक राहा

स्वत:वर प्रेम करणे गरजेचे आहे. स्वत:ला ओळखत नाही, तो पर्यंत माणूस कुणालाही ओळखू शकत नाही. तसेच इतर करतात त्यांच्यापेक्षा जास्त करायला शिका, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. आपण निवडलेल्या ध्येयाशी अर्जुनासारखे प्रामाणिक राहा तेव्हाच जीवनाच्या कुरुक्षेत्रात तुम्ही हमखास यशस्वी होणार, असेही ते म्हणाले. तसेच यावेळी युपीएससी परीक्षेत देशातून १२४ व्या रँकने उत्तीर्ण होणाऱ्या प्रांजल पाटील यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असल्यास आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी तर आभार रामकृष्ण करंके यांनी मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज