म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गालगतच्या जमिनी भूसंपादनाच्या कामास गती देऊन चौपदरीकणाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासह सर्व शासकीय योजनांना गती देऊन उद्दीष्ट वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारी (दि. १४) पत्रकारांशी बोलताना दिली.
नूतन जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी मंगळवारी, सकाळी पदभार घेतल्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी सांगितले, रुजू झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून जिल्ह्याच्या कामांचा आढावा घेतला असून, काम करताना प्रशासकीय कामांबरोबरच योजनाच्या कामे गतीने करण्याकडे कल राहील. प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, आपले सरकार पोर्टालच्या माध्यामातून जनतेचे तक्रारींचा निपटारा करणे, आदिवासी भागातील योजना, गेल्या काही दिवसांपासून ७/१२ संगणकीकरण करण्याचे काम संपविणे, वसुलीचे टार्गेट वेळेत पूर्ण करणे, जळगाव जिल्हा मुदतीत हागणदारीमुक्त करणे या कामांना प्राधान्य असणार आहे. प्राथमिक शाळांना लोकसहभागातून डिजिटल करण्याचा मानसदेखील त्यांनी व्यक्त केला.
पिण्याच्या पाण्याची टंचाई जिल्ह्यात निर्माण होऊ नये यासाठी आतापासून टँकर व तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची तयारी करणे यासह कार्यालयीन स्वच्छतेलाही महत्त्व देणार असल्याचेही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गालगतच्या जमिनी भूसंपादनाच्या कामास गती देऊन चौपदरीकणाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासह सर्व शासकीय योजनांना गती देऊन उद्दीष्ट वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारी (दि. १४) पत्रकारांशी बोलताना दिली.
नूतन जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी मंगळवारी, सकाळी पदभार घेतल्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी सांगितले, रुजू झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून जिल्ह्याच्या कामांचा आढावा घेतला असून, काम करताना प्रशासकीय कामांबरोबरच योजनाच्या कामे गतीने करण्याकडे कल राहील. प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, आपले सरकार पोर्टालच्या माध्यामातून जनतेचे तक्रारींचा निपटारा करणे, आदिवासी भागातील योजना, गेल्या काही दिवसांपासून ७/१२ संगणकीकरण करण्याचे काम संपविणे, वसुलीचे टार्गेट वेळेत पूर्ण करणे, जळगाव जिल्हा मुदतीत हागणदारीमुक्त करणे या कामांना प्राधान्य असणार आहे. प्राथमिक शाळांना लोकसहभागातून डिजिटल करण्याचा मानसदेखील त्यांनी व्यक्त केला.
पिण्याच्या पाण्याची टंचाई जिल्ह्यात निर्माण होऊ नये यासाठी आतापासून टँकर व तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची तयारी करणे यासह कार्यालयीन स्वच्छतेलाही महत्त्व देणार असल्याचेही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले.