वाहतूक तज्ज्ञ विनय मोरे यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या अधिक आहे. आपल्याला जर उज्ज्वल देश घडवायचा असेल व आई-वडीलांचे स्वप्न साकार करायचे असेल तर युवकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत सुरक्षित वाहतूक विषयातील तज्ज्ञ विनय मोरे यांनी व्यक्त केले.
जळगाव जिल्हा पोलिस दल व जिल्ह्यातील महाविद्यालये व विद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. ५) मू. जे. महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 'वाहन धारकांचे मृत्यू' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे होते. व्यासपीठावर अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल देशमुख, सतीश भामरे, प्रसन्न कुमार उपस्थित होते.
विनय मोरे यांनी सांगितले की, जोपर्यंत वाहन पार्किंगमध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित नसतात. वाहन चालकांनी मानसिकता चांगली ठेवूनच वाहने चालविली पाहिजे. आपण कागदाची झेरॉक्स काढू शकतो मात्र आयुष्याची नाही. त्यामुळे काळजीपूर्वक वाहने चालवावी, पथनाट्य व अन्य माध्यमांच्या आधारातून वाहतुकीसंदर्भात जनजागृती गरजेची असल्याचे सांगितले.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या अधिक आहे. आपल्याला जर उज्ज्वल देश घडवायचा असेल व आई-वडीलांचे स्वप्न साकार करायचे असेल तर युवकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत सुरक्षित वाहतूक विषयातील तज्ज्ञ विनय मोरे यांनी व्यक्त केले.
जळगाव जिल्हा पोलिस दल व जिल्ह्यातील महाविद्यालये व विद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. ५) मू. जे. महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 'वाहन धारकांचे मृत्यू' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे होते. व्यासपीठावर अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल देशमुख, सतीश भामरे, प्रसन्न कुमार उपस्थित होते.
विनय मोरे यांनी सांगितले की, जोपर्यंत वाहन पार्किंगमध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित नसतात. वाहन चालकांनी मानसिकता चांगली ठेवूनच वाहने चालविली पाहिजे. आपण कागदाची झेरॉक्स काढू शकतो मात्र आयुष्याची नाही. त्यामुळे काळजीपूर्वक वाहने चालवावी, पथनाट्य व अन्य माध्यमांच्या आधारातून वाहतुकीसंदर्भात जनजागृती गरजेची असल्याचे सांगितले.