सत्ताधाऱ्यांकडून दोन विषय तहकूब तर शिवसेनेचा ‘तटस्थ’चा पाढा
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेतील घोटाळ्यात नुकतीच न्यायालयाने माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह ठरावांवर स्वाक्षरी करणाऱ्या मोठ्या आर्थिक दंडासह कारावासाची शिक्षा सुनावली. या निकालाचे पडसाद बुधवारी (दि. ४) मनपाच्या स्थायी समिती बैठकीत उमटले. सत्ताधारी भाजपने संशयास्पद वाटलेले घनकचरा प्रकल्पाचे दोन प्रस्ताव तहकूब ठेवले तर विरोधक शिवसेनेनेदेखील बहुतांश प्रस्तावांवर तटस्थतेची भूमिका घेतली. इतर विषय मंजूर करण्यात आले. महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी सतरा मजलीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी व्यासपीठावर आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त अजित मुठे, उत्कर्ष गुट्टे, मिनीनाथ दंडवते, लेखापरीक्षक संतोष वाहुले व नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.
सभा सुरू झाल्यानंतर मागील सभांचे इतिवृत्त मंजूर करीत प्रशासनाचे इतर विषयही सर्वानुमते मंजूर करण्यात आले. आव्हाणे शिवारातील कचरा डेपोवर प्रक्रियेविना पडून असलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठीच्या निविदेला मंजुरी देण्याच्या प्रशासनाच्या विषयाला तहकूब ठेवण्याची विनंती भाजपच्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी केली. या वेळी त्यांनी या एजन्सीच्या कराड व पंढरपूर येथील कामांबाबत तक्रारी आल्याची माहिती सांगून त्याची शहानिशा करण्यात यावी असे सांगितले. तर शिवसेनेने तटस्थची भूमिका घेत घनकचरा प्रकल्प उभारणीचा विषयदेखील तहकूब ठेवण्यात आला.
घरकुल निकालामुळे भीती
या वेळी आयुक्त डॉ. टेकाळे यांनी या तक्रारींची शहानिशा करण्यात येईल. मात्र, ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी हा विषय मार्गी लागणे आवश्यक असल्याने तो मंजूर करण्याची विनंती केली. या वेळी भाजप नगरसेवक सुनील खडके यांनी नुकताच घरकुल घोटाळ्याचा निकाल लागला असून, त्यामुळे दक्षता घेत असून शहानिशा करूनच पुढच्या सभेत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
निर्णय न घेऊन कसे चालणार?
स्थायीत प्रस्ताव मंजूर करताना दक्षता घेणे योग्य आहे. पण भीतीमुळे निर्णयच न घेणे चुकीचे आहे, असे या वेळी आयुक्त टेकाळे यांनी सांगितले. लवकरच आचारसंहिता लागणार असल्याने विकासकामांना विलंब होईल. काम केले तर चुका होतातच असेही आयुक्त म्हणाले. हे सांगताच शिवसेनेचे विष्णू भंगाळे यांनी अशाच प्रकारे विकासाच्या हेतूने केलेले घरकुलाचे काम अंगलट आल्याचे सांगितले. पण दक्षता घेऊन काम करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
मालमत्तांच्या लिलावाला शिवसेनेचा विरोध
थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या लिलावाच्या विषयाला शिवसेनेने विरोध केला. नगरसेवक भंगाळे व नितीन बरडे यांनी गाळेधारकांचे नाव न घेता इतर थकबाकीदारांकडे कोट्यवधी रुपये असून, त्याचे काय, असा प्रश्न केला. त्यावर स्थायी सभापती मराठेंनी ती वसुलीदेखील होईल असे सांगितले. वाघूर धरणात ५५ टक्क्यापेक्षा जास्त पाणी असल्याने पाणीपुरवठा तीन दिवसांवरून दोन दिवसाआड पूर्ववत केव्हा करणार, असेही बरडे व भंगाळे यांनी विचारले. त्यावर चर्चा करुन निर्ण घेणार असल्याचे पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी सांगितले. शहरातील कामांच्या दर्जावर नितीन बरडे यांनी आयुक्तांना प्रश्न विचारले. अॅड. सुचिता हाडा यांनी लिप्ट बसविण्याचे काम तसेच गणेश कॉलनी रस्त्यातील पोल लवकर हटविण्याची मागणी केली. विषयपत्रिकेवरील संविदा मंजूर करण्यात आल्या.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेतील घोटाळ्यात नुकतीच न्यायालयाने माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह ठरावांवर स्वाक्षरी करणाऱ्या मोठ्या आर्थिक दंडासह कारावासाची शिक्षा सुनावली. या निकालाचे पडसाद बुधवारी (दि. ४) मनपाच्या स्थायी समिती बैठकीत उमटले. सत्ताधारी भाजपने संशयास्पद वाटलेले घनकचरा प्रकल्पाचे दोन प्रस्ताव तहकूब ठेवले तर विरोधक शिवसेनेनेदेखील बहुतांश प्रस्तावांवर तटस्थतेची भूमिका घेतली. इतर विषय मंजूर करण्यात आले. महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी सतरा मजलीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी व्यासपीठावर आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त अजित मुठे, उत्कर्ष गुट्टे, मिनीनाथ दंडवते, लेखापरीक्षक संतोष वाहुले व नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.
सभा सुरू झाल्यानंतर मागील सभांचे इतिवृत्त मंजूर करीत प्रशासनाचे इतर विषयही सर्वानुमते मंजूर करण्यात आले. आव्हाणे शिवारातील कचरा डेपोवर प्रक्रियेविना पडून असलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठीच्या निविदेला मंजुरी देण्याच्या प्रशासनाच्या विषयाला तहकूब ठेवण्याची विनंती भाजपच्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी केली. या वेळी त्यांनी या एजन्सीच्या कराड व पंढरपूर येथील कामांबाबत तक्रारी आल्याची माहिती सांगून त्याची शहानिशा करण्यात यावी असे सांगितले. तर शिवसेनेने तटस्थची भूमिका घेत घनकचरा प्रकल्प उभारणीचा विषयदेखील तहकूब ठेवण्यात आला.
घरकुल निकालामुळे भीती
या वेळी आयुक्त डॉ. टेकाळे यांनी या तक्रारींची शहानिशा करण्यात येईल. मात्र, ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी हा विषय मार्गी लागणे आवश्यक असल्याने तो मंजूर करण्याची विनंती केली. या वेळी भाजप नगरसेवक सुनील खडके यांनी नुकताच घरकुल घोटाळ्याचा निकाल लागला असून, त्यामुळे दक्षता घेत असून शहानिशा करूनच पुढच्या सभेत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
निर्णय न घेऊन कसे चालणार?
स्थायीत प्रस्ताव मंजूर करताना दक्षता घेणे योग्य आहे. पण भीतीमुळे निर्णयच न घेणे चुकीचे आहे, असे या वेळी आयुक्त टेकाळे यांनी सांगितले. लवकरच आचारसंहिता लागणार असल्याने विकासकामांना विलंब होईल. काम केले तर चुका होतातच असेही आयुक्त म्हणाले. हे सांगताच शिवसेनेचे विष्णू भंगाळे यांनी अशाच प्रकारे विकासाच्या हेतूने केलेले घरकुलाचे काम अंगलट आल्याचे सांगितले. पण दक्षता घेऊन काम करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
मालमत्तांच्या लिलावाला शिवसेनेचा विरोध
थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या लिलावाच्या विषयाला शिवसेनेने विरोध केला. नगरसेवक भंगाळे व नितीन बरडे यांनी गाळेधारकांचे नाव न घेता इतर थकबाकीदारांकडे कोट्यवधी रुपये असून, त्याचे काय, असा प्रश्न केला. त्यावर स्थायी सभापती मराठेंनी ती वसुलीदेखील होईल असे सांगितले. वाघूर धरणात ५५ टक्क्यापेक्षा जास्त पाणी असल्याने पाणीपुरवठा तीन दिवसांवरून दोन दिवसाआड पूर्ववत केव्हा करणार, असेही बरडे व भंगाळे यांनी विचारले. त्यावर चर्चा करुन निर्ण घेणार असल्याचे पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी सांगितले. शहरातील कामांच्या दर्जावर नितीन बरडे यांनी आयुक्तांना प्रश्न विचारले. अॅड. सुचिता हाडा यांनी लिप्ट बसविण्याचे काम तसेच गणेश कॉलनी रस्त्यातील पोल लवकर हटविण्याची मागणी केली. विषयपत्रिकेवरील संविदा मंजूर करण्यात आल्या.