अ‍ॅपशहर

Heat Wave Alert : राज्यासाठी पुढचे ४ दिवस धोक्याचे, 'या' भागात भयंकर उष्णता वाढणार

राज्यात वारंवार हवामानात मोठे बदल होत आहेत. आताही अनेक जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाच्या झळा आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 26 Apr 2022, 11:39 am
जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून आलेली उष्णतेची लाट कायम आहे. येत्या दोन दिवसांत जळगाव जिल्ह्याचा कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांवर जाण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. सोमवारी तापमान ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम heat wave in Maharashtra
heat wave in Maharashtra


गेल्या दीड महिन्यात विदर्भ-मध्य महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत तीन उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या आहेत. अद्याप मे महिना शिल्लक असून, उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात १६ मार्चपासून कमाल तापमान ४० अंशांवर कायम आहे. मार्च व एप्रिल या दोन्ही महिन्यांत आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान राहिले आहे.

राजस्थान, गुजरातकडून उष्ण वारे

भारतातील पश्चिम-उत्तर भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र कमी झाले असून, आता पुन्हा कोरडे व उष्ण वारे राजस्थान व गुजरातकडून पुन्हा सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. यंदा मागील शंभर वर्षांतील सर्वात उष्ण लाटा अनुभवास येत असून, मे महिन्यात उष्णतेचा तडाखा अधिक असेल.

रुग्णाला बेशुद्ध न करताच हृदयावर शस्त्रक्रिया, कसं झालं शक्य? वाचा सविस्तर
हवामान खात्याचा अंदाज

दिनांक- तापमान अंश सेल्सिअस

२६ एप्रिल - ४४

२७ एप्रिल - ४५

२८ एप्रिल - ४५

२९ एप्रिल - ४४

३० एप्रिल - ४३

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज