अ‍ॅपशहर

पाऊस असूनही चिंता वाढली

जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांत ५२.८ टक्के पाऊस झाला असला, तरी जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प आणि गिरणा धरणात अद्याप पाणी नसल्याने ही धरणे अखेर तहानलेलीच म्हणायची वेळ आलेली आहे. या महिन्यात होणाऱ्या पावसावर पाटबंधारे खात्याची सारी भिस्त आता अवलंबून आहे.

Maharashtra Times 2 Aug 2016, 2:36 pm
विजय पाठक, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम heavy rain in jalgaon but
पाऊस असूनही चिंता वाढली


जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांत ५२.८ टक्के पाऊस झाला असला, तरी जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प आणि गिरणा धरणात अद्याप पाणी नसल्याने ही धरणे अखेर तहानलेलीच म्हणायची वेळ आलेली आहे. या महिन्यात होणाऱ्या पावसावर पाटबंधारे खात्याची सारी भिस्त आता अवलंबून आहे.

जून-जुलै अखेर पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली असून, जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५२.८ टक्के पाऊस झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही ६६३.३ मिमी असून, आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३४९.३ मिमी पाऊस झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पाच तालुक्यांत ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे, तर जामनेर, यावल, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर या सहा तालुक्यांनी ५० टक्क्यांची सरासरीदेखील अद्याप ओलांडलेली नाही.

गिरणा धरणात जिवंतसाठा होण्यास सुरुवात झालेली असून, सध्या केवळ ७.२६ टक्के साठा आहे. ऑगस्टअखेर किमान ३० टक्के साठा झाला, तर रब्ब्बी पिकांना रोटेशन देता येईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. वाघूरमध्ये ५१ टक्के साठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ६७ टक्के साठा होता. जळगावकरांची तहान यातून भागणार असली, तरी वाघूरचे पाणी कालव्याव्दारे दिले जाणार असल्याने हे धरण पूर्ण भरणे गरजेचे आहे. सध्या होत असलेल्या पावसाने पिकांची स्थिती चांगली असली, तरी आगामी दोन महिने असाच पाऊस राहिला तरच खरिपाची पिके चांगली येतील. मात्र, रब्बीसाठी धरणात पाण्याची गरज भासणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज