जिल्ह्यात शेतीचे नुकसान; शहरात विद्युततारा पडून दोघांना मृत्यू
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
शहरासह तालुक्यात बुधवारी (दि. ६) रात्री झालेल्या वादळी पावसामुळे पंचक्रोशीतील गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. जळगाव शहरातदेखील अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळले तर रिक्षावर विद्युततारा पडून दोघा तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेदहा वाजता घडली.
जळगाव शहरासह तालुक्यात बुधवारी रात्री सव्वा आठ वाजेपासून वादळी पावसास सुरुवात झाली. सुमारे सव्वा तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. शहरातील बंजरंग बोगदा व नवीन तयार करण्यात अलेले समांतर बोगदे पाण्याने जलमय झाले होते.
जळगाव शहारात विजांच्या कडकडाटात वादळी पावासाला सुरुवात होताच अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले. नेरी नाका, आदर्श नगर, गणपती नगर, श्रीधर नगर, महाबळ परिसर, आशाबाबा नगरात वृक्ष पडून विद्युततारा तुटल्या होत्या. तर काही भागात पोस्टर व पत्रे देखून उडून गेली. शहरातील मेहरूण परिसरातील संतोषी माता मंदिराजवळील चौकात रिक्षात बसून चहा पित असताना रिक्षावर उच्च क्षमतेच्या वीजतारा पडल्या. यात रिक्षात बसलेल्या इम्रान शेख, इमाम खान, (वय ३०, रा. अक्सा नगर) व इम्रान शेख फय्याज (वय ३५ रा. मास्टर कॉलनी) यांचा होरपळून मृत्यू झाला. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. मध्यरात्री उशीरापर्यंत कोर्ट चौक, नवीपेठ व गणेश कॉलनीतील चौकामध्ये पाणी साचले होते. एसएमआयटी कॉलेज परिसरदेखील जलमय झाला होता. लेंडी नाला व दवंड्या नाल्याला पाणी आले होते.
विद्युत पुरवठा खंडित
वादळी वाऱ्यामुळे वृक्ष पडल्याने अनेक ठिकाणी महावितरणचे फीडर ट्रीप झाले होते. त्यामुळे निम्या शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
वादळी तडाख्यामुळे परिसरातील केळीबागांना मोठा फटका बसला. अनेक शेतांमध्ये केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. केळीसह इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. आधीच मे हिटमुळे अनेक केळीबागा नष्ट झालेल्या असतानाच आता वादळाचा फटका केळीला बसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
रावेरला झाडे पडून वाहतुकीस खोळंबा
रावेरलाही बुधवारी झालेल्या वादळी पावसाने चांगलेच झोडपले. तालुक्यातही केळीचे नुकसान होऊन शेतात पाणी साचले आहे. यावल, मुक्ताईनगर, चोपडा तालुक्यातील अनेकठिकाणी झाडे पडली आहेत. त्यामुळे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रात्रीनंतर वाहतूक खोळंबली होती. प्रवाशांची वाहने तासनतास खोळंबून होती. शहरात वीजपुरवठाही खंडित केल्याने नागरिकांना याचाही मनस्ताप सहन करावा लागला.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
शहरासह तालुक्यात बुधवारी (दि. ६) रात्री झालेल्या वादळी पावसामुळे पंचक्रोशीतील गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. जळगाव शहरातदेखील अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळले तर रिक्षावर विद्युततारा पडून दोघा तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेदहा वाजता घडली.
जळगाव शहरासह तालुक्यात बुधवारी रात्री सव्वा आठ वाजेपासून वादळी पावसास सुरुवात झाली. सुमारे सव्वा तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. शहरातील बंजरंग बोगदा व नवीन तयार करण्यात अलेले समांतर बोगदे पाण्याने जलमय झाले होते.
जळगाव शहारात विजांच्या कडकडाटात वादळी पावासाला सुरुवात होताच अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले. नेरी नाका, आदर्श नगर, गणपती नगर, श्रीधर नगर, महाबळ परिसर, आशाबाबा नगरात वृक्ष पडून विद्युततारा तुटल्या होत्या. तर काही भागात पोस्टर व पत्रे देखून उडून गेली. शहरातील मेहरूण परिसरातील संतोषी माता मंदिराजवळील चौकात रिक्षात बसून चहा पित असताना रिक्षावर उच्च क्षमतेच्या वीजतारा पडल्या. यात रिक्षात बसलेल्या इम्रान शेख, इमाम खान, (वय ३०, रा. अक्सा नगर) व इम्रान शेख फय्याज (वय ३५ रा. मास्टर कॉलनी) यांचा होरपळून मृत्यू झाला. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. मध्यरात्री उशीरापर्यंत कोर्ट चौक, नवीपेठ व गणेश कॉलनीतील चौकामध्ये पाणी साचले होते. एसएमआयटी कॉलेज परिसरदेखील जलमय झाला होता. लेंडी नाला व दवंड्या नाल्याला पाणी आले होते.
विद्युत पुरवठा खंडित
वादळी वाऱ्यामुळे वृक्ष पडल्याने अनेक ठिकाणी महावितरणचे फीडर ट्रीप झाले होते. त्यामुळे निम्या शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
वादळी तडाख्यामुळे परिसरातील केळीबागांना मोठा फटका बसला. अनेक शेतांमध्ये केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. केळीसह इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. आधीच मे हिटमुळे अनेक केळीबागा नष्ट झालेल्या असतानाच आता वादळाचा फटका केळीला बसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
रावेरला झाडे पडून वाहतुकीस खोळंबा
रावेरलाही बुधवारी झालेल्या वादळी पावसाने चांगलेच झोडपले. तालुक्यातही केळीचे नुकसान होऊन शेतात पाणी साचले आहे. यावल, मुक्ताईनगर, चोपडा तालुक्यातील अनेकठिकाणी झाडे पडली आहेत. त्यामुळे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रात्रीनंतर वाहतूक खोळंबली होती. प्रवाशांची वाहने तासनतास खोळंबून होती. शहरात वीजपुरवठाही खंडित केल्याने नागरिकांना याचाही मनस्ताप सहन करावा लागला.