अ‍ॅपशहर

हिंमत असल्यास पाकिस्तानने युद्ध करावे

पाकिस्तानमध्ये हिंमत असेल तर त्यांनी भारतीय सैन्याविरोधात युद्धात ताकद दाखवावी. छुपे आत्मघाती हल्ले करू नये, असे आवाहन कर्नल हरजिंदरसिंग यांनी दिले.

Maharashtra Times 18 Feb 2019, 5:00 am
कर्नल हरजिंदरसिंग यांचे आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम if there is any courage then pakistan should fight says colonel harjindarsingh at jalgoan program
हिंमत असल्यास पाकिस्तानने युद्ध करावे


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

पाकिस्तानमध्ये हिंमत असेल तर त्यांनी भारतीय सैन्याविरोधात युद्धात ताकद दाखवावी. छुपे आत्मघाती हल्ले करू नये, असे आवाहन कर्नल हरजिंदरसिंग यांनी दिले.
शहरातील मायादेवी नगरात रोटरी भवनात रोटरी जळगाव परिवारातर्फे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, जेवढे जवान शहीद होतात त्यांच्या दुप्पट संख्येने देशात जवान तयार होत असतात. याबद्दल त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील उदाहरण सांगितले. सुभेदार अनिलकुमार यांनी १९६५, १९७१ व कारगील युद्धात प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानवर मात केल्याचे सांगून या हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे असे सांगितले.

या वेळी रोटरी वेस्ट अध्यक्ष संगीता पाटील, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष किशोर सूर्यवंशी, डॉ. जयंत जहागिरदार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. राजेंद्र देशमुख यांनी शहीद जवानांची नावे वाचून दाखविली. सूत्रसंचालन गनी मेमन यांनी केले. कार्यक्रमास लक्ष्मीकांत मणियार, विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.

शहीद जवानांसाठी निधी
जम्मू काश्मीर येथील भ्याड आतंकवादी हल्ल्याचा निषेध करीत रोटरी परिवारातर्फे रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीतर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यापासून पुलवामा आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून पूर्ण दिवसाचा खेळ स्थगित ठेवण्यात आला. या आयोजनातून उभी करण्यात येणारी रक्कमदेखील भारतीय सेनेसाठी देण्यात येईल, असे आयोजकांतर्फे अध्यक्ष प्रखर मेहता यांनी कळविले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज