अ‍ॅपशहर

धान्य विकायला गेला तो परतलाच नाही! तरुणाचा अपघाती मृत्यू; चार बहिणींनी गमावला एकुलता एक भाऊ

गावोगावी जाऊन धान्य विक्री करणाऱ्या तरुणाची रिक्षा रस्त्यात बंद पडली. बंद रिक्षाला भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. धरणगाव चोपडा रोडवरील कमल जिनिंगजवळ रविवारी सकाळी ही घटना घडली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Aug 2022, 5:13 pm
जळगाव: गावोगावी जाऊन धान्य विक्री करणाऱ्या तरुणाची रिक्षा रस्त्यात बंद पडली. बंद रिक्षाला भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. धरणगाव चोपडा रोडवरील कमल जिनिंगजवळ रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. आशिष गजानन भावसार (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon accident
तरुणाचा अपघाती मृत्यू


धरणगाव शहरातील पारोळा नाका परिसरात भावडू उर्फ आशिष गजानन भावसार हा वास्तव्यास आहे. आशिष हा ग्रामीण भागात किरकोळ धान्य विक्रीचा व्यवसाय करत होता. नेहमीप्रमाणे तो आज खेडेगावावर जात असताना सकाळी ८.३० वाजता त्याची रिक्षा (एमएच १५ ईजी ६३०५) ही चोपडा रोडवरील कमल जिनिंगजवळ अचानक बंद पडली. याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने बंद पडलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. यात अशिषच्या डोक्याला व पायाला जबर दुखापत झाली. अपघातानंतर जखमी अवस्थेत आशिषला जळगाव येथील रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

चार बहिणींचा एकुलता एक भाऊ
आशिषचे पितृछत्र बालपणीच हरवलेले होते. तो चार बहिणींचा एकुलता एक भाऊ असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. आशिष मितभाषी आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहायचा. तो प्रचंड कष्टाळू होता. त्यामुळे या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज