अ‍ॅपशहर

बारावीच्या ‘आयटी’ परीक्षेत गोंधळ

जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि. १६) इयत्ता बारावीचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी)चा पेपर होता. सकाळी पेपर असताना अचानक इंटरनेट सेवा बंद झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. अखरे पर्यवेक्षकांनी तीन दिवसांनंतर ही परीक्षा पुन्हा घेण्यात येण्याचे सांगितल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

Maharashtra Times 16 Mar 2019, 10:37 pm
पिंपळनेरला परीक्षेतील प्रकार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम internet issue rise in 12th exam of information technology paper
बारावीच्या ‘आयटी’ परीक्षेत गोंधळ


म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि. १६) इयत्ता बारावीचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी)चा पेपर होता. सकाळी पेपर असताना अचानक इंटरनेट सेवा बंद झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. अखरे पर्यवेक्षकांनी तीन दिवसांनंतर ही परीक्षा पुन्हा घेण्यात येण्याचे सांगितल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

साक्री तालुक्यातील पिंपळनेरला शनिवारी (दि. १६) बारावीच्या ‘आयटी’ या विषयाची परीक्षा होती. या परीक्षेत नेट अचानक बंद झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. पिंपळनेर-नवापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना जेसीबी यंत्रचालकाकडून इंटरनेटसाठरीच्या भूमिगत वायर तुटल्याने ही नेट सेवा खंडित झाली होती. त्यामुळे अचानक नेट पुरवठा खंडित झाला होता. या वेळी संतप्त झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करीत आपला निषेध नोंदविला. शेवटी विद्यालयातील परीक्षा पर्यवेक्षक एस. एस. पवार यांनी या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पेपर पुन्हा तीन दिवसांनी घेण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेत परिसरातील गोंधळ थांबला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज