पहिलाच अत्याधुनिक प्रकल्प
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने त्रिपुरा राज्यामध्ये उभारलेल्या ‘भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे’ उद््घाटन मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या हस्ते करण्यात आले. उत्तर पूर्व राज्यातील अत्यंत अत्याधुनिक असलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ होईल आणि त्यासाठीचा लागवड खर्च कमी होणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी व्यक्त केला.
त्रिपुरातील सेपाहीजला जिल्ह्यातील जुमेरडेफा येथे भाजीपाला गुणवत्ता केंद्र उभारण्यात आले आहे. त्रिपुराची राजधानी आगरतळापासून ४० किलोमीटर अंतरावर जुमेरडेफा गाव आहे. या परिसरातील शेतकरी आदिवासी असून त्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत भाजीपाला लागवड आहे. याप्रसंगी कृषिमंत्री अघोर डेब्बारमा, मुख्य कृषि सचिव वाय. कुमार यांच्यासह जैन इरिगेशनचे प्रकल्प प्रमुख एस. एन. पाटील, एच. के. बरुआ, उमेश नावंदर, सोलर विभागाचे सहस्रबुद्धे, शाहीद, प्रवीण चौधरी यांच्यासह सहकारी उपस्थित होते.
या प्रकल्पाचे मूल्य ६.२५ कोटी रूपये असून, कमी खर्चात रोपे तयार करणारा हा प्रकल्प शाश्वत राहील असा दावा अाहे. भाजीपाला रोपे लागवड निर्मिती क्षमता प्रतिवर्ष ४४ लाख राहणार आहे. व्यापारी तत्त्वावर भाजीपाल्याची लागवडदेखील केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली. खुल्या क्षेत्रात गाजर, कलिंगड आणि कोबी यांची लागवड केली जाणार आहे. जुमेरडेफा
येथे उभारण्यात आलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये लागवडीसाठी २०४८ चौरस मीटर क्षेत्रावर ग्रीन हाऊस उभारले आहे.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने त्रिपुरा राज्यामध्ये उभारलेल्या ‘भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे’ उद््घाटन मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या हस्ते करण्यात आले. उत्तर पूर्व राज्यातील अत्यंत अत्याधुनिक असलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ होईल आणि त्यासाठीचा लागवड खर्च कमी होणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी व्यक्त केला.
त्रिपुरातील सेपाहीजला जिल्ह्यातील जुमेरडेफा येथे भाजीपाला गुणवत्ता केंद्र उभारण्यात आले आहे. त्रिपुराची राजधानी आगरतळापासून ४० किलोमीटर अंतरावर जुमेरडेफा गाव आहे. या परिसरातील शेतकरी आदिवासी असून त्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत भाजीपाला लागवड आहे. याप्रसंगी कृषिमंत्री अघोर डेब्बारमा, मुख्य कृषि सचिव वाय. कुमार यांच्यासह जैन इरिगेशनचे प्रकल्प प्रमुख एस. एन. पाटील, एच. के. बरुआ, उमेश नावंदर, सोलर विभागाचे सहस्रबुद्धे, शाहीद, प्रवीण चौधरी यांच्यासह सहकारी उपस्थित होते.
या प्रकल्पाचे मूल्य ६.२५ कोटी रूपये असून, कमी खर्चात रोपे तयार करणारा हा प्रकल्प शाश्वत राहील असा दावा अाहे. भाजीपाला रोपे लागवड निर्मिती क्षमता प्रतिवर्ष ४४ लाख राहणार आहे. व्यापारी तत्त्वावर भाजीपाल्याची लागवडदेखील केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली. खुल्या क्षेत्रात गाजर, कलिंगड आणि कोबी यांची लागवड केली जाणार आहे. जुमेरडेफा
येथे उभारण्यात आलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये लागवडीसाठी २०४८ चौरस मीटर क्षेत्रावर ग्रीन हाऊस उभारले आहे.