जिल्हा प्लास्टिक असोसिएशनतर्फे आज निवेदन
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
राज्य सरकारने प्लास्टिक व थर्माकॉलपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, विक्री, वापर यासाठी नवीन नियम बनविले. त्यानुसार सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, वाट्या, ताट, थर्माकॉलच्या वस्तूंच्या वापरावर बंदी केलेली आहे. सरकारच्या या तुघलकी निर्णयाविरुद्ध जळगाव जिल्हा प्लास्टिक असोसिएशनतर्फे लढा देण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी (दि. २७) आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष किरण राणे यांनी दिली.
या वेळी व्यापाऱ्यांनी, एका रात्रीतून प्लास्टिकशी संबंधित हजारो उद्योग बंद करणे राज्य, उद्योगाच्या दृष्टीने योग्य नाही असे सांगितले. जीवनावश्यक वस्तूंची पॅकिंग सर्व प्लास्टिकमध्येच आहेत. कारण प्लास्टिकसारखी आद्रता रोधकक्षमता दुसऱ्या कोणत्याही घटकात नाही. आज यासारखे स्वस्त मटेरिअल दुसरे कोणतेही उपलब्ध नाही. तसेच संपूर्ण प्लास्टिक हे रिसायकल (पुनर्निर्मिती) होते, असेही यावेळी सांगण्यात आले. या वेळी किरण राणे, सुभाष तोतला, रमेश मंघवाणी, अमित भुतडा, नितीन रेदासनी, पराग लुंकड, सुनील शहा यांची उपस्थिती होती.
...तर पाणीटंचाईचे संकट
आज अब्जावधी टन प्लास्टिक जे पॅकिंगसाठी वापरले जात आहे, ते बंद केल्यास त्याला पर्याय केवळ पेपर बॅगचा असू शकतो. पेपर बॅगमध्ये पॅकिंगच्या सर्व आवश्यकता पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात पेपर बॅगचा उपयोग होत राहिल्यास भारतात एकही झाड शिल्लक राहणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात पेपर बॅग तयार करावयाची झाल्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपयोग करावा लागेल. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे मोठे संकट जगासमोर उभे राहील, असे सांगत सरकारने लावलेल्या प्लास्टिक बंदीचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचे परिषदेत सांगण्यात आले.
आज निवेदन देणार
जिल्ह्यातील प्लास्टिक व्यापारी लढा देणार असून, हा निर्णय रद्द करण्यात यावा. यासाठी आज (दि. २८) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चादेखील करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती किरण राणे यांनी दिली.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
राज्य सरकारने प्लास्टिक व थर्माकॉलपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, विक्री, वापर यासाठी नवीन नियम बनविले. त्यानुसार सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, वाट्या, ताट, थर्माकॉलच्या वस्तूंच्या वापरावर बंदी केलेली आहे. सरकारच्या या तुघलकी निर्णयाविरुद्ध जळगाव जिल्हा प्लास्टिक असोसिएशनतर्फे लढा देण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी (दि. २७) आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष किरण राणे यांनी दिली.
या वेळी व्यापाऱ्यांनी, एका रात्रीतून प्लास्टिकशी संबंधित हजारो उद्योग बंद करणे राज्य, उद्योगाच्या दृष्टीने योग्य नाही असे सांगितले. जीवनावश्यक वस्तूंची पॅकिंग सर्व प्लास्टिकमध्येच आहेत. कारण प्लास्टिकसारखी आद्रता रोधकक्षमता दुसऱ्या कोणत्याही घटकात नाही. आज यासारखे स्वस्त मटेरिअल दुसरे कोणतेही उपलब्ध नाही. तसेच संपूर्ण प्लास्टिक हे रिसायकल (पुनर्निर्मिती) होते, असेही यावेळी सांगण्यात आले. या वेळी किरण राणे, सुभाष तोतला, रमेश मंघवाणी, अमित भुतडा, नितीन रेदासनी, पराग लुंकड, सुनील शहा यांची उपस्थिती होती.
...तर पाणीटंचाईचे संकट
आज अब्जावधी टन प्लास्टिक जे पॅकिंगसाठी वापरले जात आहे, ते बंद केल्यास त्याला पर्याय केवळ पेपर बॅगचा असू शकतो. पेपर बॅगमध्ये पॅकिंगच्या सर्व आवश्यकता पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात पेपर बॅगचा उपयोग होत राहिल्यास भारतात एकही झाड शिल्लक राहणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात पेपर बॅग तयार करावयाची झाल्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपयोग करावा लागेल. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे मोठे संकट जगासमोर उभे राहील, असे सांगत सरकारने लावलेल्या प्लास्टिक बंदीचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचे परिषदेत सांगण्यात आले.
आज निवेदन देणार
जिल्ह्यातील प्लास्टिक व्यापारी लढा देणार असून, हा निर्णय रद्द करण्यात यावा. यासाठी आज (दि. २८) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चादेखील करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती किरण राणे यांनी दिली.