पुढील आठवड्यापासून सात-बारावर बोझा चढविणार
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
शहरातील ज्या नागरिकांनी मनपा मालमत्ताकराची रक्कम वर्षभरापासून थकवली आहे. अशा सुमारे चारशे मोठे थकबाकीदार आता मनपाच्या रडारवर असून, त्यांच्या सातबारा उताऱ्यावर त्यांच्या थकीत रकमेचा बोझा चढविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्लृप्त्या करून महापालिकेकडून ही थकबाकी वसूल केली जाणार आहे.
महापालिकेने यासाठी चारशे बड्या थकबाकीदारांना आपली थकीत रक्कम भरण्यासाठी चार दिवसांची मुदत दिली असून, ही रक्कम न भरल्यास पुढील आठवड्यापासून मनपाकडून अशा थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मोठ्या थकबाकीदारांची नावांच्या याद्यांचे बॅनर प्रत्येक चौकाचौकात लावण्यात येणार आहेत, असेही महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
पूर्ण वसुलीसाठी तयारी
राज्य शासनाकडून आलेल्या सूचनानुसार आता मनपाची ९० टक्के वसुली करणे हे आयुक्तांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी आता त्या दृष्टीने नियोजन आखून तयारी सुरू केली आहे. महापालिकेची दि. ३१ डिसेंबर अखेरपर्यंत ५५ टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांमध्ये वसुलीची टक्केवारी वाढवण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर उभे राहिले आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात १०० थकबाकीदारांचा सात-बाराच्या उताऱ्यावर बोझा बसविण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
शहरातील ज्या नागरिकांनी मनपा मालमत्ताकराची रक्कम वर्षभरापासून थकवली आहे. अशा सुमारे चारशे मोठे थकबाकीदार आता मनपाच्या रडारवर असून, त्यांच्या सातबारा उताऱ्यावर त्यांच्या थकीत रकमेचा बोझा चढविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्लृप्त्या करून महापालिकेकडून ही थकबाकी वसूल केली जाणार आहे.
महापालिकेने यासाठी चारशे बड्या थकबाकीदारांना आपली थकीत रक्कम भरण्यासाठी चार दिवसांची मुदत दिली असून, ही रक्कम न भरल्यास पुढील आठवड्यापासून मनपाकडून अशा थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मोठ्या थकबाकीदारांची नावांच्या याद्यांचे बॅनर प्रत्येक चौकाचौकात लावण्यात येणार आहेत, असेही महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
पूर्ण वसुलीसाठी तयारी
राज्य शासनाकडून आलेल्या सूचनानुसार आता मनपाची ९० टक्के वसुली करणे हे आयुक्तांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी आता त्या दृष्टीने नियोजन आखून तयारी सुरू केली आहे. महापालिकेची दि. ३१ डिसेंबर अखेरपर्यंत ५५ टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांमध्ये वसुलीची टक्केवारी वाढवण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर उभे राहिले आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात १०० थकबाकीदारांचा सात-बाराच्या उताऱ्यावर बोझा बसविण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.