अ‍ॅपशहर

कुटुंबांसह आंदोलनाचा निर्धार

मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत कोर्टात याचिका टाकणारे तथाकथित समाजसेवक पालिकेतील घोटाळ्यांप्रकरणी आजी-माजी नगरसेवकांवर कोट्यवधींची वसुली नोटीस काढली त्याबाबत का बोलत नाही, असा सवाल गाळेधारकांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. गुरुवारी (दि. १९) मुदत संपलेल्या गाळेधारकांच्या बैठकीत पुन्हा कुटुंबासह तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार करण्यात आला.

Maharashtra Times 20 Apr 2018, 4:00 am
नगरसेवकांच्या वसुलीबाबत चुप्पीबाबत गाळेधारकांचा सवाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city galedharak again andolan with families against jalgaon municipal corporation
कुटुंबांसह आंदोलनाचा निर्धार


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत कोर्टात याचिका टाकणारे तथाकथित समाजसेवक पालिकेतील घोटाळ्यांप्रकरणी आजी-माजी नगरसेवकांवर कोट्यवधींची वसुली नोटीस काढली त्याबाबत का बोलत नाही, असा सवाल गाळेधारकांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. गुरुवारी (दि. १९) मुदत संपलेल्या गाळेधारकांच्या बैठकीत पुन्हा कुटुंबासह तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार करण्यात आला.

जळगाव मनपाच्या मुदत संपलेल्या २० मार्केटमधील गाळेधारक संघटनेची बैठक गुरुवारी, छत्रपती शाहू मार्केट येथे डॉ. शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. एलबीटीसारख्या इतरही उत्पन्न स्त्रोतांचे अनुदान फक्त कर्मचाऱ्यांचे पगार व देणी याकरिता वापरावे, असे सरकारचे आदेश आहेत. मात्र नेमके त्याच कारणासाठी वापरले जाते का, वसुली डेव्हलपमेंट चार्जेस, अनुदान शासकीय योजना निधीचा कुठे विनिमय होतो, तथाकथित सफाई कर्मचाऱ्यांची युनियन मनपाशी सलग्न आहे का, त्या युनियनला मनपाने मान्यता दिली आहे का, अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

गाळेधारकांनी सुमारे वीस कोटी रुपये भाड्यापोटी मनपात जमा केले त्यातून कर्मचाऱ्यांना पगार जळगावातील सर्व मार्केटचे व्यापारी कटुंबीय तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेले सर्व कर्मचाऱ्यांचे कुटुंबांतील मतदाता सदस्यांची मतदार यादी नवीनच बनविण्यात आलेल्या लिंकच्या माध्यमातून वेगाने सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मनपा मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, हिरानंद मंधवाणी, राजस कोतवाल, संजय पाटील, युवराज वाघ, रमेश मतानी, तेजस देपुरा, सुरेश पाटील ,पंकज मोमाया, वसीम काझी, राजेश वरयानी, सुजीत किनगे, राजेश समदाणी, बाळासाहेब पाटील, भागवत मिस्तरी, रवींद्र निकम, दीपक मंधान उपस्थित होते.

कर्मचारी आंदोलन चुकीचे
गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वीपर्यंत मनपा सफाई कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत होती, म्हणजेच गाळ्यांच्या पैशांवर मनपा कर्मचाऱ्यांचा, सफाई कामगारांचा पगार अवलंबून नाही हे सिद्ध होते. कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे वेतनासाठीचे आंदोलन असायला हवे होते, गाळेधारकांवर कारवाई करण्यासाठी नव्हे. सफाई कामगारांचे आंदोलन चुकीच्या, विशिष्ट हेतूने आंदोलन सुरू केले गेले आहे, म्हणून सरकारने याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज