अ‍ॅपशहर

गाळ्यांबाबतच्या ठरावाचा संभ्रम कायम

महापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर मनपाने थकीत भाड्यापोटी लावलेला पाचपट दंड रद्दचा महासभेने केलेल्या ठरावावर चार महिन्यांपासून प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. हा ठराव विखंडनाला पाठवला जात नाही किंवा त्याची अंमलबजावणीदेखील केली जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

Maharashtra Times 14 Jul 2019, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city market shops issue continues
गाळ्यांबाबतच्या ठरावाचा संभ्रम कायम


महापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर मनपाने थकीत भाड्यापोटी लावलेला पाचपट दंड रद्दचा महासभेने केलेल्या ठरावावर चार महिन्यांपासून प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. हा ठराव विखंडनाला पाठवला जात नाही किंवा त्याची अंमलबजावणीदेखील केली जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

मूदत संपलेल्या २० मार्केटमधील २३७९ गाळेधारकांनी सात वर्षाची भाड्याची रक्कम मनपाकडे भरलेली नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने एका वर्षांसाठी गाळेधारकांवर थकीत भाड्यापोटी ५ पट दंडचा निर्णय घेतला होता. त्यानुसारच गाळेधारकांना बिलांचे वाटप करण्यात आले आहे. गाळेधारकांचा मनपाच्या निर्णयाला विरोध आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या महासभेत गाळेधारकांवर लावण्यात आलेला पाचपट दंडचा निर्णय रद्द करण्याचा ठराव केला होता. या ठरावाला शिवसेनेने विरोध केला होता. दरम्यान, हा ठराव करून चार महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असूनही मनपाकडून ठरावाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. या ठरावानंतर मनपा प्रशासनाने काही विधीतज्ज्ञांचा सल्ला घेतला असता तज्ज्ञांनीदेखील हा ठराव मनपाच्या आर्थिक हिताचा नसल्याचे सांगत हा ठराव विखंडनासाठी पाठविण्याचा सल्ला दिला होता. तसेच हा ठराव आता विधानसभा निवडणुकीनंतरच विखंडनासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज