अ‍ॅपशहर

केवळ १८ कोटींची वसुली

महापालिकेच्या मुदत संपलेल्या संकुलातील २३८७ गाळेधारकांकडे गाळेभाड्याचे थकबाकीपोटी २६२ कोटींची मागणी मनपा प्रशासनाकडे आहे. त्यात गाळेधारकांनी हरकत कायम ठेवून प्रशासनाने दिलेल्या बिलांच्या रक्कमेनुसार भरणा न करता केवळ १८ कोटी रुपये जमा केले आहेत.

Maharashtra Times 19 Feb 2018, 4:00 am
२६२ कोटींची मागणी; मनपाकडून गाळे लिलाव प्रक्रिया अंतिम टप्प्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fule market


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेच्या मुदत संपलेल्या संकुलातील २३८७ गाळेधारकांकडे गाळेभाड्याचे थकबाकीपोटी २६२ कोटींची मागणी मनपा प्रशासनाकडे आहे. त्यात गाळेधारकांनी हरकत कायम ठेवून प्रशासनाने दिलेल्या बिलांच्या रक्कमेनुसार भरणा न करता केवळ १८ कोटी रुपये जमा केले आहेत. सर्व गाळेधारकांची पैसे भरण्याची मुदत संपलेली असूनदेखील मनपा अजून गाळेधारकांची पैसे स्वीकारत आहे. ज्या गाळेधारकांनी अजूनपर्यंत पूर्ण पैसे भरलेले नाहीत मनपा प्रशासन त्या गाळेधारकांना थकबाकीदार घोषीत करणार आहे.

मनपा प्रशासनाकडून गाळे लिलाव करण्यासाठी ऑनलाइन लिलाव प्रणाली विकसित केलेली आहे. त्यातच आता गाळे लिलावाबाबत अटी-शर्ती बाबत विधी सल्लागार यांच्याकडून कायदेशीर अभिप्राय मागितलेला आहे. अभिप्राय मिळाल्यानंतर ऑनलाइन लिलावाच्या निविदा प्रसिद्ध या केल्या जाणार आहेत. मुदत संपलेल्या संकुलातील गाळे लिलाव प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानुसार मनपा प्रशासनातर्फे गाळे लिलावसाठीच्या अटी-शर्ती या तयार करण्यात आल्या आहेत.

अटीशर्ती पडताळणीसाठी पाठविल्या

महापालिकेच्या मुदत संपलेल्या १८ व्यापारी संकुलातील २३८७ गाळ्यांचे २०१२ पासून ते आजतागायत गाळेधारकांकडे भाडे थकीत आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाने बिले वितरित करण्यात आली होती. त्यातील काही गाळेधारकांनी हरकत कायम ठेवून प्रशासनाने दिलेल्या बिलांच्या रक्कमेनुसार भरणा न करता, विशिष्ट रक्कमेचाच भरणा केला आहे. त्यातच सरकारच्या महसूल विभागाने खंडपीठाच्या निर्देशानुसार गाळे ताब्यात घेण्याच्या कारवाईला हिरवा कंदिल दिला आहे. तर त्यापूर्वीच मनपा प्रशासनातर्फे गाळे लिलाव प्रक्रिया ऑनलाइन प्रणाली तसेच गाळ्यांचे मुल्याकंन, अपसेट प्राइज आदी काढण्याचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. आता गाळे लिलावासाठी प्रशासाने अटी-शर्ती तयार केल्या असल्याने त्या नियमानूसार आहे का नाही याची पडताळणीसाठी महापालिकेचे विधी सल्लागार यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.

अभिप्रायानंतर कारवाई

मनपा प्रशासानची गाळे लिलावाची प्रक्रिया ही अंतिम टप्यात आलेली आहे. त्यानुसार गाळे लिलाव करताना गाळेधारकांना अटी व शर्ती या तयार केलेल्या आहे. या अटी-शर्तींचे कायदेशीर पडताळणी केली जात असून, विधी सल्लागार यांचा अभिप्राय मिळाला नंतर लगेच गाळे ताब्यात घेण्याची कारवाई होणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज