महापालिकेच्या कारवाईकडे लक्ष
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
शहरातील मुदत संपलेल्या गाळेधारकांकडे गेल्या अनेक वर्षांपासून थकीत भाड्याची रक्कम सोमवारपर्यंत (दि. २४) भरण्याचा अल्टिमेटम आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी गाळेधारकांना दिला होता. मात्र, एकाही गाळेधारकांनी गेल्या चारदिवसात थकीत भाडे भरले नाही. त्यामुळे आता आयुक्तांच्या इशाऱ्याप्रमाणे उद्या (दि. २६) पासून मुदत संपलेले गाळे जप्तीची कारवाई होणार का, याकडे जळगावकरांचे लक्ष लागून आहे.
महापालिकेच्या १८ मार्केटमधील २१७५ गाळेधारकांची मुदत संपली आहे. गेल्या चार वर्षांपासून या गाळ्यांची भाड्याची बिले प्रशासनाने दिली आहेत. मात्र, अद्याप गाळेधारकांनी पूर्ण बिले भरलेली नाहीत. गाळेधारकांची थकीत बिले व नूतनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी त्यांच्या दालनात गाळेधारकांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती.
या काही गाळेधारकांनी हरकत कायम ठेवून प्रशासनाने दिलेल्या बिलांच्या रकमेनुसार भरणा न करता, विशिष्ट रकमेचाच भरणा केला आहे. सुमारे सतराशे गाळेधारकांनी भरलेल्या रक्कमेतून केवळ २२ कोटीच वसूल झाले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या बैठकीत थकीत गाळेभाडे भरण्याची सोमवारपर्यंत मुदत दिली होती. मात्र, गाळेधारकांकडून आयुक्तांच्या या सूचनेची दखल घेतली गेली नाही. सोमवारी आयुक्तांनी दिलेली मुदत संपली. थकीत भाडे सोमवारपर्यंत न भरल्यास आयुक्तांनी उद्यापासून गाळे जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आता आयुक्त इशारा दिल्याप्रमाणे कारवाई करतात का, याकडे लक्ष लागले आहे.
२९२ कोटींची थकबाकी
मुदत संपलेल्या २० मार्केटमधील २३८७ गाळेधारकांकडे सन २०१२-१३ पासून ते आतापर्यंत सुमारे २९२ कोटी रुपयांची भाड्याची थकबाकी आहे. त्यात सन २०१४ -१५ या वर्षांसाठी पाचपट दंड आहे. तसेच सन २०१६-१७, सन २०१७-१८ व सन २०१८-१९ मधील सहा महिन्यांना २ टक्के शास्ती आकारण्यात आली आहे.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
शहरातील मुदत संपलेल्या गाळेधारकांकडे गेल्या अनेक वर्षांपासून थकीत भाड्याची रक्कम सोमवारपर्यंत (दि. २४) भरण्याचा अल्टिमेटम आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी गाळेधारकांना दिला होता. मात्र, एकाही गाळेधारकांनी गेल्या चारदिवसात थकीत भाडे भरले नाही. त्यामुळे आता आयुक्तांच्या इशाऱ्याप्रमाणे उद्या (दि. २६) पासून मुदत संपलेले गाळे जप्तीची कारवाई होणार का, याकडे जळगावकरांचे लक्ष लागून आहे.
महापालिकेच्या १८ मार्केटमधील २१७५ गाळेधारकांची मुदत संपली आहे. गेल्या चार वर्षांपासून या गाळ्यांची भाड्याची बिले प्रशासनाने दिली आहेत. मात्र, अद्याप गाळेधारकांनी पूर्ण बिले भरलेली नाहीत. गाळेधारकांची थकीत बिले व नूतनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी त्यांच्या दालनात गाळेधारकांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती.
या काही गाळेधारकांनी हरकत कायम ठेवून प्रशासनाने दिलेल्या बिलांच्या रकमेनुसार भरणा न करता, विशिष्ट रकमेचाच भरणा केला आहे. सुमारे सतराशे गाळेधारकांनी भरलेल्या रक्कमेतून केवळ २२ कोटीच वसूल झाले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या बैठकीत थकीत गाळेभाडे भरण्याची सोमवारपर्यंत मुदत दिली होती. मात्र, गाळेधारकांकडून आयुक्तांच्या या सूचनेची दखल घेतली गेली नाही. सोमवारी आयुक्तांनी दिलेली मुदत संपली. थकीत भाडे सोमवारपर्यंत न भरल्यास आयुक्तांनी उद्यापासून गाळे जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आता आयुक्त इशारा दिल्याप्रमाणे कारवाई करतात का, याकडे लक्ष लागले आहे.
२९२ कोटींची थकबाकी
मुदत संपलेल्या २० मार्केटमधील २३८७ गाळेधारकांकडे सन २०१२-१३ पासून ते आतापर्यंत सुमारे २९२ कोटी रुपयांची भाड्याची थकबाकी आहे. त्यात सन २०१४ -१५ या वर्षांसाठी पाचपट दंड आहे. तसेच सन २०१६-१७, सन २०१७-१८ व सन २०१८-१९ मधील सहा महिन्यांना २ टक्के शास्ती आकारण्यात आली आहे.