अ‍ॅपशहर

जेवणात एकच चपाती दिल्याच्या रागातून चिमुकल्या भावंडांना केलं खल्लास, जळगावात खळबळ

या प्रकरणात पोलीस चौकशी करत असून चुलत भाऊ निलेश साबळे याचा जबाब घेताना पोलिसांना तफावत आढळली आणि त्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Maharashtra Times 29 Oct 2021, 12:00 pm
जळगाव : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. जळगाव मधूनही नात्याला काळिमा फासणारी अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरुणाने दोन चिमुकल्या चुलत भावांना विहिरीत टाकून दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime


दोन्ही भावांचा कुठेही तपास लागत नसल्याने आई-वडिलांनी इतर ठिकाणी शोध घेतला असता दोघांचाही मृतदेह विहिरीत आढळून आला. या प्रकरणात पोलीस चौकशी करत असून चुलत भाऊ निलेश साबळे याचा जबाब घेताना पोलिसांना तफावत आढळली आणि त्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी घाबरलेल्या आरोपींना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आपणच नोकरासारखी वागणूक देत असून एकच चपाती दिल्याच्या रागातून त्यांची हत्या केल्याचं आरोपी निलेश यांनं पोलिसांना म्हटलं. दरम्यान, या प्रकरणात त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी कुटुंबाकडून करण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज